Latur: लातूरमध्ये लग्न समारंभातील जेवण जेवल्यानंतर 330 हून अधिक लोकांना विषबाधा
लातूर (Latur) जिल्ह्यातील निलंगा (Nilanga) तालुक्यात एका लग्न समारंभात मेजवानी घेतल्याने 330 हून अधिक लोक आजारी पडले. एका आरोग्य अधिकाऱ्याने ही माहिती दिली. लग्न समारंभात शेकडो लोकांसाठी जेवण बनवलेल्या केदारपूर गावात रविवारी ही घटना घडली, असे त्यांनी सांगितले.
लातूर (Latur) जिल्ह्यातील निलंगा (Nilanga) तालुक्यात एका लग्न समारंभात मेजवानी घेतल्याने 330 हून अधिक लोक आजारी पडले. एका आरोग्य अधिकाऱ्याने ही माहिती दिली. लग्न समारंभात शेकडो लोकांसाठी जेवण बनवलेल्या केदारपूर गावात रविवारी ही घटना घडली, असे त्यांनी सांगितले. समारंभात सर्व काही सुरळीत चालले होते, पण लोक जेवायला लागल्यावर लगेचच त्यांची तब्येत बिघडू लागली. अधिकाऱ्याने सांगितले की, या विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या काही लोकांना जेवण खाल्ल्यानंतर अस्वस्थ वाटू लागले तर काही लोकांना उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर केदारपूर आणि जावलगा गावातील एकूण 336 लोकांना अंबुलगा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले.
तर काही जणांवर वलंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. अधिकाऱ्याने सांगितले की, उपचारानंतर आता सर्वांची प्रकृती स्थिर आहे आणि सर्वांना पूर्वीपेक्षा बरे वाटत आहे. ते म्हणाले की, बहुतांश लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. लोकांची काळजी घेण्यासाठी तिन्ही गावात आरोग्य पथके तैनात करण्यात आली होती. हेही वाचा Kandivali Murder Case: प्रेयसीकडे पाहत राहिल्याने तरुणाला राग अनावर, संतापलेल्या अवस्थेत मित्राची केली हत्या
ते म्हणाले की, अन्न खाल्ल्यानंतर समारंभात सहभागी असलेल्या काही लोकांना अन्नातून विषबाधा झाल्याची तक्रार होती. तक्रार केलेल्या लोकांमध्ये 133 जावलगा, 178 केदारपूर आणि 25 काटे जावलगा येथील लोकांचा समावेश आहे. आजारी लोकांच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य पथके या तीन गावांमध्ये तळ ठोकून आहेत, असे अधिकारी म्हणाले आणि सर्व रुग्णांची काळजी घेतली जात आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 25, 2022 11:15 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

