उशीराने आलेल्या मान्सूनने एका दिवसांतच संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकला आहे. हवामान खात्याकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मान्सूनच्या आगमनामुळे खरीप हंगामाची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून महाराष्ट्रात उशीराने दाखल झाला होता. मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर रायगडसह कोकणाला हवामान खात्याने धोक्याचा इशारा दिला आहे. कोकणातील काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)