Mumbai Metro Update: ठाण्यात वेगवेगळ्या शहरांना जोडणाऱ्या मेट्रो 4, 5 लाइन 2025 पर्यंत पूर्ण होतील, अधिकाऱ्यांची माहिती

प्राधिकरणाने दावा केला आहे की मध्य मुंबईतील वडाळा ते ठाण्यातील गायमुख आणि ठाणे, भिवंडी आणि कल्याणला जोडणारी मेट्रो मार्ग 4 आणि ठाणे, भिवंडी आणि कल्याणला जोडणारी मेट्रो मार्ग 4 या दोन्ही मार्गांचे काम 2025 पर्यंतच पूर्ण होणे अपेक्षित आहे.

Mumbai Metro Update: ठाण्यात वेगवेगळ्या शहरांना जोडणाऱ्या मेट्रो 4, 5 लाइन 2025 पर्यंत पूर्ण होतील, अधिकाऱ्यांची माहिती
Representational Image | (Photo Credits: ANI)

गेल्या चार वर्षात सध्या सुरू असलेल्या मेट्रो लाईन (Metro Line) 4 च्या कामाला होत असलेल्या दिरंगाईमुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) बांधकाम कामाला गती देण्यासाठी पूर्वीचे काही उपकंत्राटदार बदलण्याचा निर्णय घेतला आहे. प्राधिकरणाने दावा केला आहे की मध्य मुंबईतील वडाळा ते ठाण्यातील गायमुख आणि ठाणे, भिवंडी आणि कल्याणला जोडणारी मेट्रो मार्ग 4 आणि ठाणे, भिवंडी आणि कल्याणला जोडणारी मेट्रो मार्ग 4 या दोन्ही मार्गांचे काम 2025 पर्यंतच पूर्ण होणे अपेक्षित आहे. 2031 पर्यंत दोन मार्गांवर मिळून अंदाजे 15 लाख प्रवासी प्रवास करतील. लाईन 5 च्या पहिल्या टप्प्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.

SVR श्रीनिवास, आयुक्त, MMRDA म्हणाले, आम्ही मेट्रो लाईन 4 साठी उप-कंत्राटदार बदलण्याच्या प्रक्रियेत आहोत कारण, गेल्या चार वर्षांत काम खूपच मंद झाले आहे. म्हणून, आम्ही आता एक कॅच-अप प्लॅन तयार केला आहे. ज्याच्या आधारे काही काम विविध प्राधिकरणांद्वारे समांतरपणे कार्यान्वित केले जातील. मेट्रो लाईन 4 चे काम ऑक्टोबर 2018 मध्ये सुरु झाले तर लाईन 5 चे काम डिसेंबर 2017 मध्ये सुरु झाले. हेही वाचा MHADA Lottery 2022: म्हाडाच्या घरांसाठी मुंबईत दिवाळी मध्ये तर पुणे विभागातही लवकरच जाहीर होणार सोडत

या दोन्ही मार्गांवर अनेक अडथळे आले. मेट्रो लाइन 4 सध्या त्याच्या मूळ नियोजित तारखेच्या पलीकडे आहे. मेट्रो कारशेडसाठी मोघरपाडा भूखंड अंतिम करणे हे विलंबाचे एक कारण होते. मोघरपाडा भूखंड हा सरकारी जमीन असून त्याला CRZ ची मर्यादा नाही. मोघरपाड्याची लोकसंख्या 4,000 लोक आणि 1,200 कुटुंबे आहेत. सुमारे 200 शेतकरी दावा करतात की ही जमीन सरकारी असली तरी 1960 मध्ये सरकारने त्यांना लागवडीसाठी ती भाडेतत्त्वावर दिली होती.

त्यांनी भूखंड ताब्यात घेण्यासाठी काही मागण्या अधिकाऱ्यांसमोर ठेवल्या. दरम्यान, या जमिनीवर कार डेपोच्या बांधकामाची निविदा एमएमआरडीएने रद्द केली होती. आता एमएमआरडीएकडून नवीन निविदा काढण्यात येणार आहेत. श्रीनिवास पुढे म्हणाले, ठाणे जिल्हाधिकार्‍यांनी भूसंपादन प्रक्रियेतील छोटे-मोठे बदल पूर्ण करतील, तोपर्यंत आम्ही कारशेडच्या कामासाठी नवीन कंत्राटदारासाठी बोली लावू, जेणेकरून कामाला आणखी विलंब होणार नाही. मेट्रो लाइन 4 आणि 5 कापूरबावडीमध्ये छेदतील. येथे एक स्टेशन असेल जे दोन्ही मार्गांना जोडेल.

MMRDA च्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मेट्रो लाईन 4 वेळापत्रकाच्या मागे धावत आहे. तर मेट्रो लाईन 5 चा पहिला टप्पा शेड्यूलवर आहे. मेट्रो लाईन 4 चे बहुतांश पिलरचे काम पूर्ण झाले असून स्थानकांचे काम सुरू आहे. आम्ही ठिकठिकाणी गर्डरही टाकले आहेत. मात्र, या मार्गावरील काम नियोजित वेळेपेक्षा खूपच मागे आहे. श्रीनिवास पुढे म्हणाले, मेट्रो लाईन 5 च्या फेज 1 चे सुमारे 30% काम पूर्ण झाले आहे.

मेट्रो लाईन 5 दोन टप्प्यात विभागली गेली आहे. फेज 1 मध्ये ठाणे ते भिवंडी मार्ग आणि फेज 2 मध्ये भिवंडी ते कल्याण मार्ग समाविष्ट आहे. दुसऱ्या टप्प्यात अनेक आस्थापना आहेत. ज्यांवर परिणाम होईल. म्हणून, पर्यायी 3km भूमिगत मार्गाची योजना आखण्यात आली आहे ज्यामुळे 1,597 पैकी 735 संरचनांना सुरुवातीला बाधित होण्यापासून वाचवले जाईल. फेज 2 मधील आस्थापनांचे पुनर्वसन आणि पाडणे अद्याप सुरू व्हायचे आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 03, 2022 10:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).