भारताचे माजी अष्टपैलू कसोटीपटू बापू उर्फ रमेशचंद्र गंगाराम नाडकर्णी यांचे मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले आहे. नाडकर्णी हे ८७ वर्षांचे होते. नाडकर्णी हे त्यांची पत्नी, मुलगी, जावई, नातू यांच्यासह पवई येथील हिरानंदानी गार्डन येथे मुलीकडे राहत होते. तिथेच आज त्यांची प्राणज्योत मालवली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावरून साई जन्मभूमीवरील वादाने अधिक पेट घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परभणी जिल्ह्याजवळील पाथरीला साईंचे जन्मस्थान म्हणून संबोधित केल्याने शिर्डीतील लोक संतप्त झाले आहेत. यामुळे शिर्डीतील नागरिकांनी 19 जानेवारीपासून अनिश्चित बंदची घोषणा केली आहे.
'न्यू इंडियन कॉन्स्टिट्यूशन' या नावाने एक 'पीडीएफ बुकलेट' सध्या ऑनलाईन शेअर होत आहे. मोहन भागवत यांनी ते बनवले असल्याचा खोटा प्रचार होत असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
Nagpur: Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) has lodged complaint in connection with online circulation of PDF booklet named as 'New Indian Constitution' which has been attributed to Mohan Bhagwat.— ANI (@ANI) January 17, 2020
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा प्रकर्षाने दिसून येत असल्याने आता मनसे मराठीचा मुद्दा सोडून हिंदुत्वावर जास्त भर देणार असे दिसून येते. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी नुकतंच हे पोस्टर ट्विट केलं आहे, ज्यात 'विचार महाराष्ट्र धर्माचा ! निर्धार हिंदवी स्वराज्याचा !' असं एक ब्रीदवाक्य लिहिलं आहे.
pic.twitter.com/v0xhaORxmr— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 17, 2020
संजय राऊत यांच्या वक्तव्यावर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचं मत मांडलं आहे. पत्रकारांशी संवाद साधताना या संबंधित माहिती दिली आहे. शरद पवार म्हणाले, “संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यापासून मला दूर ठेवा. मला त्या वादात पडायचं नाही. परंतु, इंदिरा गांधींबद्दल त्यांनी असं बोलायला नको होतं.”
आज भाजपचे बडे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. परंतु, प्रसाद लाड यांनी अजित पवारांची आज नेमकी कोणत्या कारणासाठी भेट घेतली हे अद्याप कळलेलं नाही.
गेल्या अनेक महिन्यांपासून पुणे-मुंबई हायपरलूपबाबत चर्चा सुरु आहे. मात्र सध्या तरी ही हायपरलूप नको असल्याचे संकेत, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘हायपरलूप आजपर्यंत जगात कुठेही बांधले गेलेले नाही, म्हणून इथल्याआधी दुसरीकडे कुठे त्याची सुरुवात होऊ दे. एकदा ते यशस्वी झाल्यावर आपण इथेही त्याबद्दल विचार करूया.’
Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar on Pune-Mumbai hyperloop project: Hyperloop has never been constructed anywhere in the world till now, so let this be tried somewhere else before us. Once it is successful, then we can think of it. pic.twitter.com/CY2ELMbEWB— ANI (@ANI) January 17, 2020
दिल्ली: निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही दोषींची फाशी पुढे ढकलण्यात आली असून आता 22 जानेवारी ऐवजी 1 फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता त्यांना तिहार जेल येथे मृत्युदंड दिला जाईल. आज दोषी मुकेश सिंह याची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळल्यांनंतर दिल्ली उच्च न्यायलायकडून हा निर्णय देण्यात आला आहे.
2012 Delhi gang-rape case: A Delhi court issues fresh death warrant for convicts for 1st February, 6 am pic.twitter.com/hHvXo6Av1d— ANI (@ANI) January 17, 2020
डॉ. बॉम्ब उर्फ कुख्यात दहशतवादी जलील अन्सारी याला उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. 1993 सहित 50 बॉम्बस्फोटात नाव जोडलेल्या अन्सारी याला अजमेर बॉम्बस्फोटप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तूर्तास 21 दिवसांच्या पॅरोलवर असताना काल 16 जानेवारी पासून ते बेपत्ता होते.
बीड विधानपरिषद रिक्त जागेसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संजय दौंड यांची बिनविरोध निवड झाली आहे, दौंड यांच्या विरुद्ध असणाऱ्या भाजपच्या राजन तेली यांनी अगदी ऐनवेळी संख्याबळ नसल्याने आपला अर्ज मागे घेतला त्यामुळे दौंड यांचा मार्ग मोकळा झाल्याचे समजत आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्यावर आपले टीकास्त्र सोडून शिवछत्रपतींचे वारस असल्याचा पुरावा घेऊन या असे विधान केले होते, ज्यांनंतर उदयनराजेंच्या समर्थकांकडून सातारा बंद करण्यात आला होता तर आज सांगली (Sangali) मध्ये सुद्धा संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या शिवप्रतिष्ठान (Shiv Pratishthan) तर्फे बंदाची हाक देण्यात आली आहे. अशातच आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा सांगली दौरा देखील नियोजित आहे.
संभाजी भिडे यांनी संजय राऊत यांना पदावरुन हटवावे, अन्यथा हे बंद यापुढेही कायम राहील असा इशाराही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. यावर मुख्यमंत्र्यांचे मत अजूनही समोर आलेले नाही.
आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या
दुसरीकडे, मुंबईत आज थंडीने मागील कित्येक वर्षातील रेकॉर्ड मोडून काढत तब्बल 11. 4 अंशावर घसरण केली आहे. अशातच उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींमुळे पुढील काही दिवस तापमानाचा पारा कमी होणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. सांताक्रूझ येथे आज सकाळी 11.4 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली, तर कुलाबा येथील तापमान 14.5 अंश होते. गेल्या दहा वर्षांत 2013 या दोन वर्षांत इतक्या कमी तापमानाची नोंद झाली होती. तर नाशिक, निफाड येथे तापमान घसरून 2.4 अंशावर उतरले आहे. समान परिस्थिती राज्यभरात पाहायला मिळत आहे.