Aaditya Thackeray On Proposed Concretisation of Roads in Mumbai: मुंबई मध्ये प्रस्तावित रस्त्यांच्या क्रॉंकेटीकरणावरून आदित्य ठाकरे यांचा पुन्हा हल्लाबोल; विचारले हे '10' प्रश्न

400 किलोमीटरच्या रस्त्यांमध्ये 6 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा त्यांचा दावा आहे. आज यावरूनच पुन्हा हल्लाबोल करत आदित्य ठाकरेंनी 10 प्रश्नांचा भडिमार राज्य सरकार आणि बीएमसी प्रशासनाला केला आहे.

Aaditya Thackeray On Proposed Concretisation of Roads in Mumbai: मुंबई मध्ये प्रस्तावित रस्त्यांच्या क्रॉंकेटीकरणावरून आदित्य ठाकरे यांचा पुन्हा हल्लाबोल; विचारले हे '10' प्रश्न
Aaditya Thackeray| Twitter

मुंबई मध्ये रस्त्यांचे 100% कॉंक्रेटीकरण( Concretisation of Roads in Mumbai) होणार या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये (BMC) या कामामध्ये आर्थिक घोटाळा झाला असल्याचा दावा शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केला आहे. दरम्यान 400 किलोमीटरच्या रस्त्यांमध्ये 6 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा त्यांचा दावा आहे. आज यावरूनच पुन्हा हल्लाबोल करत आदित्य ठाकरेंनी 10 प्रश्नांचा भडिमार राज्य सरकार आणि बीएमसी प्रशासनाला केला आहे.

आज शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बीएमसी कडून टेंडर प्रक्रियेपासूनच कसा घोटाळा झाला असू शकतो याचे अंदाज मांडले आहेत. त्यामुळे त्यांनी बीएमसीला सारी कंत्राटं रद्द व्हायला हवीत यासाठी आग्रह केला आहे. कोणत्याच शहरामध्ये 100% क्रॉंकेटीकरण केले जाऊ शकत नाही. कारण त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होऊ शकत नसल्याचं ते अगदी उन्हाळ्यात टायर फूटण्याच्या समस्या येऊ शकतात असे सांगत मुंबई शहरातच हे कसं शक्य याचं उत्तर मागवलं आहे. सोबतच हे 400 किमीचे रस्ते प्रस्ताव मागितले कुणी? त्यासाठीचा प्रस्ताव प्रशासकाला देणं कितपत योग्य? असा सवाल देखील विचारला आहे. नक्की वाचा:  Aditya Thackeray On State Government: राज्य सरकारला मुंबईच्या मोकळ्या जागा नष्ट करायच्या आहेत, आदित्य ठाकरेंची टीका .

Aaditya Thackeray यांची पत्रकार परिषद

सोबतच 400 किमीच्या रस्त्यांसाठी सार्‍या यंत्रणांकडून परवानगी मिळवली आहे का? त्याच्या खर्चाची तरतूद कुठे आहे? त्याची टाईमलाईन तयार आहे का? असे प्रश्न देखील आदित्य ठाकरेंनी विचारले आहे.

मुंबई मध्ये क्रॉंक्रिटीकरणामुळे आताच्या घडीला 80% पाणी वाहून जात आहे ते पूर्वीप्रमाणे जमिनीत झिरपत नाही. अशात आता 100% क्रॉंक्रेटी करण झाल्यास जोशीमठ प्रमाणे मुंबई देखील खचली तर त्याला जबाबदार कोण असेल? असा सवाल विचारताना त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 16, 2023 04:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).