मुंबई मध्ये रस्त्यांचे 100% कॉंक्रेटीकरण( Concretisation of Roads in Mumbai) होणार या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये (BMC) या कामामध्ये आर्थिक घोटाळा झाला असल्याचा दावा शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केला आहे. दरम्यान 400 किलोमीटरच्या रस्त्यांमध्ये 6 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा त्यांचा दावा आहे. आज यावरूनच पुन्हा हल्लाबोल करत आदित्य ठाकरेंनी 10 प्रश्नांचा भडिमार राज्य सरकार आणि बीएमसी प्रशासनाला केला आहे.
आज शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बीएमसी कडून टेंडर प्रक्रियेपासूनच कसा घोटाळा झाला असू शकतो याचे अंदाज मांडले आहेत. त्यामुळे त्यांनी बीएमसीला सारी कंत्राटं रद्द व्हायला हवीत यासाठी आग्रह केला आहे. कोणत्याच शहरामध्ये 100% क्रॉंकेटीकरण केले जाऊ शकत नाही. कारण त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होऊ शकत नसल्याचं ते अगदी उन्हाळ्यात टायर फूटण्याच्या समस्या येऊ शकतात असे सांगत मुंबई शहरातच हे कसं शक्य याचं उत्तर मागवलं आहे. सोबतच हे 400 किमीचे रस्ते प्रस्ताव मागितले कुणी? onclick="open_search_form(this)">