Mumbai Fraud: मुंबईतील एका महिलेने कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी ढोंगी गुरूजींकडे साधला संपर्क, मात्र फसवणूकीत गमावले 37 लाख रुपये
पोलिसांनी सांगितले की, स्वतःला ज्ञानेश्वर गुरुजी म्हणून सांगणाऱ्या धर्मगुरूने उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) धार्मिक विधी करण्याच्या बहाण्याने महिलेला चार वर्षांपासून पैसे देण्यास प्रवृत्त केले. ज्यामुळे तिला वैयक्तिक समस्यांवर मात करण्यास मदत होईल.
दहिसर (Dahisar) येथील एका 45 वर्षीय महिलेने पोलिसात (Mumbai Police) तक्रार दाखल केली आहे की, अयोध्येतील (Ayodhya) एका व्यक्तीने आपली 37 लाख रुपयांची फसवणूक (Fraud) केली आहे. पोलिसांनी सांगितले की, स्वतःला ज्ञानेश्वर गुरुजी म्हणून सांगणाऱ्या धर्मगुरूने उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) धार्मिक विधी करण्याच्या बहाण्याने महिलेला चार वर्षांपासून पैसे देण्यास प्रवृत्त केले. ज्यामुळे तिला वैयक्तिक समस्यांवर मात करण्यास मदत होईल. या महिलेने पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ती बेरोजगार होती, अविवाहित होती. तिची आई गंभीर आजारी होती आणि तिच्या कुटुंबात संघर्ष होता. ज्यामुळे ती शांततेत जगू शकली नाही.
पोलिसांनी सांगितले की, जानेवारी 2018 मध्ये महिलेने टेलिव्हिजनवर एक जाहिरात पाहिली. ज्यामध्ये ज्ञानेश्वर गुरुजींकडे कौटुंबिक समस्यांवर उपाय असल्याचे दाखवण्यात आले होते. तिने त्याच्याशी संपर्क साधला. त्यांनी दावा केला की पूजा आणि हवन यांसारख्या काही विधी तिच्या समस्या सोडवण्यास मदत करतील. ते म्हणाले की ते सध्या अयोध्येत आहेत आणि तेथे धार्मिक विधी पार पाडतील, एका अधिकाऱ्याने सांगितले. हेही वाचा Hingoli Murder Case: हिंगोलीमध्ये दारुच्या सवयीला कंटाळून पत्नी आणि मुलांनी केली शेतकऱ्याची हत्या, तिघांना अटक
गुरुजींनी तिला सांगितले की तिला मुंबईहून येण्याची गरज नाही. त्याऐवजी ते तिला मार्गदर्शन करतील आणि विधींसाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तू पाठवतील, जे ती घरी पार पाडू शकेल. विधी वेळेवर करा, अन्यथा विपरीत परिणाम होऊ शकतो, असेही त्याने तिला सांगितले. तिने हे मान्य केले, अधिकारी पुढे म्हणाला. तेव्हापासून तो तिला लक्ष्मी यंत्र आणि अस्थिकलश कुरिअरने पाठवत होता. कुरिअर पाठवल्यानंतर फसवणूक करणारा फोन करून पैशाची मागणी करायचा. जेव्हा ती महिला त्याची तपासणी करण्यासाठी अयोध्येला गेली तेव्हा नोव्हेंबरपर्यंत तो हे करत राहिला, अधिकारी म्हणाला.
अयोध्येला पोहोचल्यानंतर जेव्हा ती स्त्री ज्ञानेश्वर गुरुजींना शोधू लागली तेव्हा तिला समजले की असा कोणीही देवमान नाही. त्यानंतर तिने फोनवर त्याचा सामना केला आणि तिला पैसे परत मागितले. फसवणूक करणाऱ्याने नंतर फोन बंद केला, अधिकारी म्हणाला. यानंतर महिलेने दहिसर येथील एमएचबी पोलीस ठाण्यात धाव घेत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ज्या फोनवरून त्याने महिलेशी संपर्क साधला त्या नंबरच्या कॉल डेटा रेकॉर्डवरून पोलिस गुन्हेगाराला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Dec 03, 2021 11:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

