उद्धव ठाकरे सरकार पाडण्यासाठी दोन वर्षांत झाल्या 100-150 बैठका; देवेंद्र फडणवीसांची महत्वाची भूमिका, Tanaji Sawant यांचा दावा
सावंत म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने ते संतप्त झाले आणि त्यांनी फडणवीसांच्या सांगण्यावरून जानेवारी 2020 मध्ये राज्यात पहिली बंडखोरी सुरू केली. या दोन वर्षांच्या काळात ते विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांना भेटले. त्यांना समजावून सांगून त्यांचा विचार बदलला.
सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलेली बंडखोरी ही महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामधील एक मोठी घटना होती. यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. आता याबाबत महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी एक मोठे विधान केले आहे, ज्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रातील सरकार बदलल्याचा दावा केला आहे. जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आमदारांनी बंड केले, ज्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस युतीचे सरकार पडले. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि भाजपच्या युतीमध्ये नवे सरकार स्थापन झाले.
महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री तानाजी सावंत यांनी धाराशिव येथील जाहीर सभेत सांगितले की, 'आम्ही (शिंदे गटाचे नेते) आणि देवेंद्र फडणवीसजी यांच्या अनेक बैठका झाल्या. मी आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षांत 100 ते 150 बैठका घेतल्या. यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून शिवसेना आणि भाजपने धाराशिव जिल्हा परिषदेची निवडणूक एकत्र लढवली आणि येथूनच युतीला सुरुवात झाली.
आपणच पहिल्यांदा मातोश्रीवर जाऊन बंडाचा बिगुल वाजवला, असे सावंत म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन करणे म्हणजे शिवसेना-भाजप युतीला मतदान करणाऱ्या राज्यातील 12 कोटी जनतेचा अपमान असल्याचेही सावंत म्हणाले.
सावंत म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने ते संतप्त झाले आणि त्यांनी फडणवीसांच्या सांगण्यावरून जानेवारी 2020 मध्ये राज्यात पहिली बंडखोरी सुरू केली. या दोन वर्षांच्या काळात ते विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांना भेटले. त्यांना समजावून सांगून त्यांचा विचार बदलला. फडणवीसांच्या आदेशानुसार आपण पहिल्यांदा बंड केले, ही वस्तुस्थिती असल्याचेही ते म्हणाले. (हेही वाचा: Maharashtra Politics: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार पडण्याची शक्यता, जयंत पाटीलांचा दावा)
तानाजी सावंत यांच्या वक्तव्याने विरोधकांना सरकारला कोंडीत पकडण्याची संधी मिळाली आहे. तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) नेते आणि महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, बंडाची बीजे शिंदेंच्या आमदारांच्या मनात खूप आधीपासून असल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्धव ठाकरे पक्षाच्या आमदारांना भेटत नाहीत आणि मंत्री व आमदारांना निधी दिला जात नाही, असा आरोप बंडखोर आमदारांनी केला होता, हा आरोप किंवा सबब पोकळ असल्याचे यावरून स्पष्ट होते.
(The above story first appeared on LatestLY on Mar 29, 2023 05:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

