
Rani Lakshmi Bai Death Anniversary 2025 Messages in Marathi: भारतामधील 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यातील वीरांगना, झाशीची राणी लक्ष्मी बाई (Rani Lakshmi Bai) या ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढाईत एक प्रेरणादायी प्रतीक बनल्या. आज, 2 जून रोजी त्यांची तिथीनुसार पुण्यतिथी (Rani Lakshmi Bai Death Anniversary 2025). 19 नोव्हेंबर 1828 रोजी वाराणसी येथे मराठा कऱ्हाडे ब्राह्मण कुटुंबात राणी लक्ष्मी बाई म्हणजेच माहेरच्या मणिकर्णिका तांबे यांचा जन्म झाला.
त्यांना लहानपणी ‘मनू’ म्हणून संबोधले जायचे. त्यांच्या आई, भागीरथी सप्रे, यांचे मणिकर्णिका चार वर्षांच्या असताना निधन झाले, आणि वडील मोरोपंत तांबे, जे पेशवे बाजीराव दुसरे यांच्या सेवेत होते, यांनी तिचे पालनपोषण केले. मणिकर्णिकाला घरीच शिक्षण मिळाले, ज्यात लेखन, वाचन, तलवारबाजी, घोडेस्वारी, आणि मल्लखांब यांचा समावेश होता. तिच्या बालमित्रांमध्ये नाना साहेब आणि तात्या टोपे यांचा समावेश होता, ज्यांनी नंतर 1857 च्या बंडात तिच्यासोबत लढा दिला.
पुढे 1842 मध्ये मणिकर्णिकाचे झाशीचे महाराज गंगाधर राव नेवाळकर यांच्याशी लग्न झाले, आणि त्या लक्ष्मीबाई बनल्या. 1951 मध्ये त्यांना पुत्ररत्न झाले, पण तो चार महिन्यांचा असतानाच मरण पावला. गंगाधर राव यांनी 1853 मध्ये मृत्यूपूर्वी आपल्या चुलत भावाचा मुलगा आनंद राव याला दत्तक घेतले, ज्याचे नाव दामोदर राव ठेवले. मात्र, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने दामोदर राव यांना वारस म्हणून मान्यता नाकारली आणि झाशी ब्रिटिश साम्राज्यात विलीन करण्याचा निर्णय घेतला. यामुळे लक्ष्मीबाई यांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले.
1857 मध्ये मेरठ येथे सुरू झालेल्या भारतीय बंडात लक्ष्मीबाई यांनी झाशीच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली. मात्र, कोटा की सराई येथे ब्रिटिश सैन्याशी झालेल्या लढाईत लक्ष्मीबाई गंभीर जखमी झाल्या व त्यांना वीरगती प्राप्त झाली. राणी लक्ष्मीबाई पुरुष सैनिकाच्या वेशात लढत होत्या आणि आपला मृतदेह ब्रिटिशांच्या हाती लागू नये म्हणून एका संन्याशाला त्याचे दहन करण्यास सांगितले.
तर, आजच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त, काही Messages, Whatsapp Status, HD Images शेअर करत त्यांना अभिवादन करा.
दरम्यान, ब्रिटिश कमांडर ह्यू रोज याने लक्ष्मीबाई यांचे ‘सुंदर, हुशार, आणि सर्वात धोकादायक बंडखोर नेते’, असे वर्णन केले होते. राणी लक्ष्मीबाई या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या अनेक महिलांच्या आदर्श होत्या. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे नेतृत्व, धैर्य, आणि देशप्रेम भारतीय तरुणांना नेहमीच प्रेरणा देत राहील.