
Rani Lakshmi Bai Death Anniversary 2025 Images in Marathi: राणी लक्ष्मीबाई (Rani Lakshmi Bai), झाशीची शूर राणी, यांची आज, 2 जून 2025 रोजी तिथीनुसार पुण्यतिथी (Rani Lakshmi Bai Death Anniversary). 1858 साली ग्वाल्हेरजवळील कोटा की सराई येथे ब्रिटिश सैन्याशी लढताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या शौर्यपूर्ण जीवनाचा आणि बलिदानाचा स्मरणार्थ, त्यांचा स्मृतिदिन भारतभर आदराने पाळला जातो. मणिकर्णिका तांबे म्हणून जन्मलेली लक्ष्मीबाई झाशीच्या राणी म्हणून प्रसिद्ध झाली आणि तिच्या शौर्याने इतिहासाच्या पानांवर अमरत्व मिळवले. मराठी समाजासाठी, विशेषतः महाराष्ट्र आणि झाशी परिसरातील लोकांसाठी, त्यांच्या बलिदानाचा दिन देशप्रेम आणि स्त्रीशक्तीचा जागर आहे.
राणी लक्ष्मीबाईंचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 रोजी वाराणसी येथे मणिकर्णिका तांबे या नावाने झाला. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे मराठा साम्राज्यातील एक अधिकारी होते. बालपणापासूनच त्यांनी घोडेस्वारी, तलवारबाजी, आणि युद्धकलेचे शिक्षण घेतले. 1842 मध्ये त्यांचा विवाह झाशीचे राजा गंगाधर राव यांच्याशी झाला आणि त्या झाशीच्या राणी झाल्या. 1853 मध्ये राजा गंगाधर राव यांच्या निधनानंतर, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने 'डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स' या धोरणानुसार झाशी संस्थान ताब्यात घेतले. राणी लक्ष्मीबाई यांनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि झाशीच्या स्वातंत्र्यासाठी लढा सुरू केला.
1857 च्या स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि झाशीच्या किल्ल्याचे संरक्षण करताना त्यांनी अपूर्व शौर्य दाखवले. 1858 ध्ये, ग्वाल्हेरच्या लढाईत त्यांनी ब्रिटिश सैन्याशी सामना केला. कोटा की सराई येथे झालेल्या या लढाईत त्यांनी वीरमरण पत्करले. त्यांच्या या बलिदानामुळे त्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या एक प्रतीक बनल्या. (हेही वाचा: अयोध्या नगरी मध्ये पुन्हा रंगणार प्राण प्रतिष्ठेचा सोहळा; एकाच वेळी 8 मंदिरातील पूजेची सुरूवात शरयू जल कलश यात्रेने होणार)
अशा या महान राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त, त्यांच्या अदम्य साहसाने भरलेल्या जीवन आठवूया आणि त्यांच्या महान स्मृतीस काही Messages, Whatsapp Status, HD Images शेअर करत वंदन करू या.
दरम्यान, कथेनुसार, राणी लक्ष्मीबाई पुरुष सैनिकाच्या वेशात लढत होत्या आणि आपला मृतदेह ब्रिटिशांच्या हाती लागू नये म्हणून एका संन्याशाला त्याचे दहन करण्यास सांगितले. राणी लक्ष्मीबाईंचे जीवन हे धैर्य, स्वाभिमान, आणि मातृभूमीप्रेमाचे प्रतीक आहे. आजही लक्ष्मीबाई यांचे शौर्य कथाकथन, कविता, आणि लोकगीतांमधून जिवंत आहे.