Rajasthan Assembly Elections 2018 Exit Poll: राजस्थानमध्ये जनादेश काँग्रेसच्या बाजूने, भाजप सत्तेतून पायऊतार होण्याची शक्यता
Rajasthan Assembly Assembly Elections 2018 | (Photo courtesy: Archived, edited and representative images)

Rajasthan Assembly Assembly Elections 2018 Exit Poll Results: मध्य प्रदेश (Madhya Pradesh), राजस्थान ( Rajasthan), छत्तीसगढ (Chhattisgarh), तेलंगणा (Telangana) आणि मिझोराम (Mizoram)या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी सुरु असलेले मतदान आज (शुक्रवार, ७ डिसेंबर) पूर्ण झाले. मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आणि मिझोराम या राज्यांसाठी मतदान आगोदरच पूर्ण झाले होते. तर, राजस्थान आणि तेलंगणासाठी मतदान आज पार पडले. पाचही राज्यातील मतदानानंतर 11 डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. दरम्यान, तोपर्यंत सर्वांना उत्सुकता लागली आहे ती एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात याकडे. त्यामुळे विविध वृत्तवाहिण्या, संस्थांनी केलेल्या सर्व्हेक्षणतातील निकालाबाबतचे अंदाज जाहीर झाले आहेत. या संस्थांचे एक्झिट पोल काय सांगत आहेत? हे विस्ताराने जाणून घ्या...

काय सांगतायत एक्झिट पोल? कोणालाआहे जनादेश

  • Times Now CNX ने आपल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 85 जागा तर, काँग्रेस 105 तर इतर पक्षांना 9 जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवला आहे.
  • AXIS MY INDIA ने आपल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 55 ते 72 जागा तर, काँग्रेसला 119 ते 141 जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर, अन्य राजकीय पक्षांना 4 ते 11 जागा मिळतील असे म्हटले आहे.
  • Republic C Voterने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार भाजपला 83 ते 103 जागा. काँग्रेसला 81 ते 101 तर इतर राजकीय पक्षांना 15 जागा मिळू शकतील असा अंदाज वर्तवला आहे.

    India Todayने वर्तवलेल्या अंदाजानुसार राजस्थानमध्ये काँग्रेसला 119 जागा, भाजपला 55 ते 72 जागा मिळतील.

  • Aaj Tak Axis ने वर्तवलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपला 55 ते 72, काँग्रेसला 119 ते 141 जागा, बीएसपीला 01 ते 03 जागा, इतर राजकीय पक्षांना 3 चे 8 जागा मिळतील असा अंदाज आहे.
  • News 24-Pace Media ने वर्तवलेल्या अंदाजानुसार भाजपला 70 ते 80 जागा मिळतील. काँग्रेसला 110 ते 120 जागा मिळतील असे म्हटले आहे.

(हेही वाचा : मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे पारडे जड, भाजप पराभवाच्या छायेत; पाहा कुणाला किती जागा?)

राजस्थानमध्ये प्रामुख्याने सत्ताधारी भाजप आणि विरोधातील काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर आहे. एकूण जागांपैकी सुमारे 50 जागांवर राजकीय पक्षांचे वरिष्ठ आणि वलयांकीत नेते आमनेसामने आहेत. तर, सुमारे 180 अपक्ष उमेदवारही जनमताचा कौल आजमावत आहेत. भाजप सर्वच्या सर्व जागांवर निवडणूक लढवत आहे. तर, काँग्रेसने आपल्या सहकारी पक्षांना 5 जागा सोडल्या आहेत. बहूजन समाजवादी पक्ष 190 जागा लढवतो आहे. तर सीपीआय (एम) 28 जागा लढवत आहे. सीपीआयने 16 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.