मुंबई: महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल पाहायला मिळत असून भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) राज्याच्या अंतर्गत भागांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात पुढील २४ तासांत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अवकाळी पावसामुळे उन्हाच्या चटक्यापासून काहीसा दिलासा मिळणार असला, तरी शेतीकामांना याचा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
चार जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये हवामान बिघडण्याची शक्यता आहे. विशेषतः सोलापूर हवामान अंदाज, धाराशिव हवामान अंदाज (उस्मानाबाद), लातूर हवामान अंदाज आणि नांदेड हवामान अंदाज या चार जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' देण्यात आला असून नागरिकांनी विजा चमकत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत थांबू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
View this post on Instagram
विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्राची स्थिती
मराठवाड्यासोबतच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली परिसरात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. दुसरीकडे, मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मात्र उष्ण आणि दमट हवामान कायम राहणार आहे. कोकणात पावसाची शक्यता कमी असली तरी वाढत्या आर्द्रतेमुळे उकाडा असह्य होण्याची शक्यता आहे.