Coronavirus In India Update: एका दिवसात कोरोनाचे 9983 रुग्ण वाढले, 206 मृत्यूंची नोंद; देशातील कोरोनाबाधितांची संख्या 2,56,611 वर (राज्यनिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी पहा)
Coronavirus (Photo Credit: Twitter)

Coronavirus Update In India: देशात मागील 24 तासात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत सर्वात मोठी वाढ झाली आहे. कालच्या दिवसभरात देशात 9983 नव्या कोरोना रुग्णांची आणि 206 मृत्यूंची नोंद झाली आहे. यानुसार आता देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा हा 2 लाख 56 हजार 611 वर पोहचला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, यापैकी 1,25,381 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत तर आजवर 7135 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. याशिवाय 1,24,095 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे समजत आहे. आजपासून Unlock च्या तिसऱ्या टप्प्यात देशातील विविध भागात धार्मिक स्थळे सुरु करण्यात आली आहेत, तसेच अनेक ठिकाणी खाजगी कार्यालये सुद्धा सुरु करण्यात आली आहेत. कोरोना व्हायरस संदर्भात लेटेस्ट अपडेट जाणुन घेण्यासाठी इथे क्लिक करा

कोरोना व्हायरसचा हॉटस्पॉट ठरलेल्या महाराष्ट्रात मागील 24 तासात कोरोनाचे 3007 नवे रुग्ण आढळून आले होते, यानुसार राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही 85 हजाराच्या पार गेली आहे. महाराष्ट्राच्या पाठोपाठ दिल्ली, तामिळनाडू, गुजरात, पश्चिम बंगाल मध्ये सुद्धा सर्वाधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. सर्व राज्यातील कोरोनाबाधितांचे सविस्तर आकडे जाऊन घेण्यासाठी खालील तक्ता तपासून पहा.

देशातील कोरोनाबाधितांची राज्यनिहाय आकडेवारी

 

          राज्य         संक्रमित रुग्ण           मृत्यू         बरे झालेले रुग्ण
महाराष्ट्र 43601 3060 39314
दिल्ली 16229 761 10664
तामिळनाडु 14399 269 16999
गुजरात 5186 1249 13635
पश्चिम बंगाल 4488 396 3303
उत्तर प्रदेश 4076 275 6185
कर्नाटक 3259 61 2132
जम्मु काश्मीर 2830 41 1216
राजस्थान 2718 240 7641
मध्य प्रदेश 2658 412 6331
बिहार 2578 30 2480
हरियाणा 2286 28 2134
आंध्रप्रदेश 1951 75 2682
आसाम 1946 4 615
तेलंगणा 1747 123 1710
केरळ 1096 15 803
ओडिशा 953 9 1894
उत्तराखंड 814 13 528
छत्तीसगढ 786 4 283
त्रिपुरा 608 0 192
झारखंड 602 7 490
पंंजाब 451 51 2106
गोवा 235 0 65
हिमाचल प्रदेश 184 5 224
मणिपुर 120 0 52
नागालॅंंड 110 0 8
पुद्दुचेरी 63 0 36
लडाख़ 52 1 50
अरुणाचल प्रदेश 50 0 1
चंदिगढ 36 5 273
मिझोराम 33 0 1
मेघालय 22 1 13
दादरा नगर हवेली 18 0 2
सिक्कीम 7 0 0
अंदमान आणि निकोबार बेटे 0 0 33
एकुण 125381 7135 124094

दरम्यान, एपिडेमिओलॉजी इंटरनॅशनल सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात कोरोना व्हायरस हा सप्टेंबर पर्यंत भारतातून नष्ट होईल असा दावा करण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयांतर्गत (Health Ministry), आरोग्य सेवा महासंचालनालयात उप-महासंचालक (सार्वजनिक आरोग्य) डॉ. अनिल कुमार (Dr Anil Kumar) आणि उप सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) रुपाली रॉय यांनी याबाबत सर्वेक्षण केले आहे. या दोघांनीही बेली मॉडेलच्या (Bailey’s Model) आधारे हा दावा केला आहे.