मंगळवार, सप्टेंबर 08, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Xiaomi Skynomad N70 Photos: एका चार्जमध्ये मुंबई ते थेट दिल्ली? शाओमीची 1461 किमी धावणारी नवी SUV बाजारात; भारतात प्रवेशाबाबत पुष्टी नाही | Pune MHADA Lottery Income Proof: 15 सप्टेंबरच्या मुदतीपूर्वी म्हाडाचा अर्जदारांना अनपेक्षित दिलासा; उत्पन्नाच्या दाखल्याची 'ती' सक्ती अखेर रद्द | महाराष्ट्र शेतमाल तारण कर्ज योजना: गोदामात माल ठेवून शेतकऱ्यांना मिळणार 75 टक्के कर्ज, 6 टक्के व्याजदर |

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यासह आणखी दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; 4 नोव्हेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Darshana Pawar | Nov 04, 2020 11:42 PM IST
A+
A-
04 Nov, 23:42 (IST)

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासह फिरोज शेख आणि नितेश सारडा यांना अलिबाग जिल्हा दंडाधिकारी कोर्टाने 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ट्विट-

 

04 Nov, 23:11 (IST)

असाम येथे आज आणखी 380 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ज्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 7 हजार 741 वर पोहचली आहे. यापैकी 934 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 98 हजार 694 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात 8 हजार 110 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ट्विट-

 

04 Nov, 22:31 (IST)

तामिळनाडूमध्ये आज कोरोना विषाणूच्या 2,487 रुग्णांची नोंद झाली, यासह एकूण संक्रमितांची संख्या 7.34 लाख झाली आहे. एकूण मृत्यूंची संख्या 11,244 वर पोहोचली आहे.

04 Nov, 22:05 (IST)

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान भोपाळ येथील निवासस्थानी पत्नी साधना सिंह चौहान यांच्यासमवेत करवाचौथ साजरा करताना दिसत आहे. ट्विट-

 

04 Nov, 21:32 (IST)

महापारेषण, महावितरण आणि महानिर्मिती कंपन्यांच्या आर्थिक स्थितीचा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आढावा घेतला आहे. वीज देयक वसुलीसाठी ऊर्जामंत्र्यांनी कृती आराखडा मांडला आहे. वीज कंपन्यांचा तोटा कमी करा, उत्पन्नाचे नवे स्रोत शोधा, संगनमताने होणारी वीज बिलातील लूट थांबविण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. ट्वीट-

 

04 Nov, 21:00 (IST)

राज्य आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आज कोरोना विषाणूच्या 5.505 रुग्णांची नोंद झाली आहे. आज राज्यात 8,728 रुग्ण बरे झाले आहेत व 125 मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 16,98,198 झाली आहे. आजपर्यंत 15,40,005 रुग्ण बरे झाले असून सध्या 1,12,912 सक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

04 Nov, 20:29 (IST)

गुजरातच्या अहमदाबादमधील पिपलाज रोडवरील कापड गोदामात लागलेल्या आगीतील मृतांचा आकडा 12 वर पोहोचला आहे. बचाव कार्य पूर्ण झाले आहे.

04 Nov, 20:04 (IST)

द्राक्ष बागायतदार संघटनेच्या प्रतिनिधींची कृषी राज्यमंत्री अश्वजीत कंदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या मदतीसाठी शासन सकारात्मक आहे. कृषी विभागाने यासंबंधीचा अहवाल तातडीने शासनाकडे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

04 Nov, 18:46 (IST)

रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी पोलिस पथक मुंबईत त्यांच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हा एका महिला पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

04 Nov, 18:13 (IST)

सध्याच्या कोरोना व्हायरस परिस्थितीमध्ये, भारतीय विमान कंपन्या पुढील 24 फेब्रुवारी 2021 पर्यंत त्यांच्या कोरोना व्हायरस आधीच्या उड्डाण क्षमतेच्या 60 टक्के उड्डाणे चालवू शकतात. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

Load More

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणुका पार पडल्या असून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणी दरम्यान व्हाईट हाऊसची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. अमेरिकन मीडिया रिपोर्टनुसार, डेमोक्रॅटिक अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन यांनी टेक्सास, जॉर्जिया, फ्लोरिडा, न्यू हॅम्पशायर आणि वर्मोंट याठिकाणी आपली जागा पक्की केली आहे. तर डोनाल्ड ट्रम्प हे साऊथ डकोटा आणि नॉर्थ डकोटा येथे विजयी झाले आहेत. दरम्यान, व्हाईट हाऊसजवळ लोकांची मोठी गर्दी असून चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. निकालाकडे संपूर्ण अमेरिकन नागरिकांसोबतच जगाचे लक्ष लागले आहे.

राफेलची दुसरा ताफा आज भारतात दाखल होईल. यात तीन राफेल विमानं फ्रान्समधून थेट भारतात पोहचतील. यासोबत मिड एअर रिफ्युइलींग विमानही असणार आहे. 28 जुलै रोजी 5 राफेल विमानं भारतात दाखल झाली होती आणि 10 सप्टेंबर रोजी ही विमाने अधिकृतपणे अंबाला येथे भारतीय हवाई दलात दाखल झाली.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

दरम्यान, भारतात कोरोना व्हायरसचे संकट कायम असले तरी गेल्या काही दिवसांपासून परिस्थिती नियंत्रणात आल्याचे चित्र दिसू लागले आहे. भारतात गेल्या 7 आठवड्यांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत दररोज पडणाऱ्या भरीची संख्या कमी झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण पुन्हा एकदा वाढू नये यासाठी येणाऱ्या सणसुदीच्या काळात विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.

SocialLY


Show Full Article Share Now
Close
Latestly whatsapp channel