सोलापूर जिल्हा शाळेचे शिक्षक रंजितसिंह डिसले यांना  Global Teacher Award जाहीर झाल्याने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अभिनंदन केले आहे.

केरळात मासेमारीसाठी पूर्ण बंदी घालण्यासह सर्वोतोपरी काळजी घेण्याचा IMD चा राज्याला इशारा दिला आहे.

झारखंड मध्ये आज 233 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले 6 रुग्ण दगावले आहेत. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 1 लाख 9 हजार 771 वर पोहोचली असून मृतांची संख्या 977 वर पोहोचली आहे. तसेच आज 208 रुग्ण बरे झाले असून सद्य घडीला राज्यात 1926 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 15 डिसेंबरला गुजरातच्या कच्छ परिसरात जगातील सर्वात मोठ्या सौर आणि पवन ऊर्जा उद्यानाचे उद्घाटन करणार आहेत.

मुंबईत आज दिवसभरात 764 रुग्ण बरे झाले असून कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची एकूण संख्या 2,58,112 वर पोहोचली आहे. तर 878 नव्या रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 2,83,689 वर पोहोचली आहे.

हरियाणा कोरोनाचे आणखी 1635 रुग्ण आढळले असून 32 जणांचा बळी गेला आहे.

कांदिवली येथे 45 वर्षीय व्यक्ती, मुलगा आणि मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 5182 रुग्ण आढळले असून 115 जणांचा बळी गेला आहे.

गीतांजली राव  Time मॅगझिनची Kid Of the year  ठरली आहे.  

गुजरात येथे कोरोनाचे आणखी 1540 रुग्ण आढळले असून 13 जणांचा बळी गेला आहे.

Load More

विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी झालेल्या मतदानाची आज मतमोजणी आहे. महाविकास आघाडी विरूद्ध भाजपा यांच्यामध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतचं आहे. अमरावती, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मराठवाडा मध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामधील ही निवडणूक आहेत. आज उशिरा पर्यंत हा निकाल हाती येण्याची शक्यता आहे. यासोबतच धुळे- नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणूकीचा निकाल हाती लागणार आहे.

दरम्यान दक्षिण भारतामध्ये आता बुरेवी चक्रीवादळ धडकणार आहे. तमिळनाडू आणि केरळमध्ये या चक्रीवादळाचा धोका अधिकआहे. काल बुरेवी चक्रीवादळ श्रीलंकेच्या किनारपट्टीवरून पुढे सरकले. 3 डिसेंबरला मुन्नारकडे तर 4 डिसेंबरला कन्याकुमारी ते तमिळनाडूच्या दिशेने सरकण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

भारतामध्ये सध्या शेतकर्‍यांचा मुद्दा देखील संघर्षाचा झाला आहे. दिल्ली हरियाणा सीमेवर केंद्र सरकराच्या कृषी कायद्याविरूद्ध आंदोलन करणार्‍यांना आता राजस्थानातील शेतकरी देखील सहभागी झाले आहेत. आज पुन्हा केंद्रीय कृषीमंत्र्यांना शेतकरी भेटणार आहेत. खेळाडू पाठोपाठ साहित्यिकांनी देखील किसान आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.