अशोक लवासा यांच्या राजीनाम्यानंतर राजीव कुमार यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती. राजीव कुमार 1 सप्टेंबर रोजी पदाचा कार्यभार स्वीकारतील.

सेमी हाय-स्पीड ट्रेन सेट (Vande Bharat) च्या 44 सेटच्या निर्मितीच्या निविदा रद्द करण्यात आली आहे. सुधारित सार्वजनिक खरेदी (मेक इन इंडियाला प्राधान्य) च्या आदेशानुसार एका आठवड्यात नवीन निविदा आणल्या जातील, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. सुखकर्ता, विघ्नहर्ता श्रीगणरायांच्या चरणी वंदन करून राज्यावरील कोरोनाचं संकट दूर करण्याचे घातले साकडे. यंदाचा गणेशोत्सव कोरोना व्हायरस प्रतिबंधक नियमांचं पालन करुन साजरा करण्याचे आवाहन.

गोव्यात कोरोनाचे आणखी 385 रुग्ण आढळून आल्याने आकडा 13,484 वर पोहचला आहे.

राजस्थान येथे कोरोनाचे आणखी 1335 रुग्ण आढळून आले तर 12 जणांचा बळी गेला आहे.

आदरणीय खा. शरद पवार साहेबांच्या सुचनेनुसार येत्या 31 ऑगस्टपासून जनता दरबार आयोजित केला जाणार आहे. दर गुरुवारी दुपारी 2 ते 4 या वेळेत मुंबई येथील पक्ष कार्यालयात हा दरबार भरेल.  भेटताना कृपया सामाजिक अंतर व कोरोनाविषयक नियमांची खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अश्लील टिप्पण्या पोस्ट केल्याप्रकरणी औरंगाबाद शहरातील 26 वर्षीय व्यक्तीला अटक झाल्याची माहिली पोलिसांनी दिली आहे.

मुंबईत आज 1,406 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 42 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय आज 1,235 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

  

लोकप्रिय लोक गायिका शारदा सिन्हा यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

शरद पवार यांच्या बारामती येथील गोविंद बाग बंगल्यात काम करणाऱ्या 4 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

 

Load More

मुंबईत (Mumbai) आज सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली असून मुंबईतील अनेक भागात पावसाची संततधार सुरुच आहे. भांडूप (Bhandup), सायन (Sion), माटुंगा (Matunga) येथे सकाळपासूनच पावसाने चांगलाच जोर धरला असून अंधेरी, सांताक्रूज येथे जोरदार पाऊस पडत आहे. दरम्यान मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणारा सर्वात मोठा तानसा तलाव (Tansa Dam) काल संध्याकाळी 7.05 मिनिटांनी ओव्हरफ्लो झाला. यामुळे ही बातमी मुंबईकरांसाठी दिलासादायक आहे अशीच म्हणावी लागेल. यामुळे मुंबईकरांसमोर उभे असलेले पाणीटंचाईचे संकट काहीसे कमी होईल असे म्हणण्यास हरकत नाही.

तर दुसरीकडे दर दिवसा भारतात 9 लाखांहून अधिक कोविड-19 (COVID-19) च्या चाचण्या वाढल्या असल्याचे WHO संस्थेने म्हटले आहे. गेल्या 24 तासांत 9 लाख 18 हजार 470 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे देशातील एकूण चाचण्यांची संख्या 3.25 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे. भारतात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 28,36,926 वर पोहचली असून त्यापैकी 6,86,395 अॅक्टीव्ह रुग्ण (Active Cases) असून 20,96,665 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

तर महाराष्ट्रात कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 6,43,289 वर पोहोचली असून 21,359 रुग्णांची कोरोना विरुद्धची झुंज अयशस्वी ठरली आहे. सद्य घडीला राज्यात 1,62,491 रुग्णांवर उपचार सुरु आहे.