देशातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या 1834 पर्यंत वाढली आहे. त्यातील 144 रुग्ण उपाचारानंतर बरे झाले आहेत. तर 41 जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 437 नव्या रुग्णांची भर पडल्याने हा आकडा 1834 पर्यंत वाढला आहे.

धारावी येथे एका कोरोना व्हायरस बाधित व्यक्तिचा मृत्यू झाला. मुंबई पोलिसांनी या घटनेनंतर हा व्यक्ती राहात असलेला परिसर सील केला आहे. या वेळी मुंबई पोलीस आणि स्थानिक नागरिका यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे वृत्त आहे.

जळगाव येथील एका व्यक्तिची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे पुढे आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी अधिक दक्षता घ्यावी असे अवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

नागरिकांनी काळजी घ्यावी. काळजी करु नये. गर्दी टाळावी. घाबरून जाऊ नये. सरकारला सहकार्य करवे, असे अवाहन वरळी येथील आमदार आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आणि वरळी येथील जनतेला केले आहे.

धारावी येथील कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समजते. हा व्यक्ती 56 वर्षीय होता. या रुग्णावर मुंबई येथील सायन रुग्णालयात उपचार सुरु होते. या व्यक्तीसह मुंबईत आज मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 4 इतकी असल्याचे समजते.

महाराष्ट्र आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसमुळे आज महाराष्ट्रात आणखी 4 जणांचा मृत्यू झाला असून, राज्यात एकूण मृतांचा आकडा 16 झाला आहे. राज्यात एकूण रूग्णांची संख्या 335 वर पोहोचली आहे. रुग्णालयातून 41 लोकांना सोडण्यात आले.

ऑल इंग्लंड लॉन टेनिस अँड क्रोकेट क्लबने निर्णय घेतला आहे की कोरोना व्हायरस साथीमुळे, विम्बल्डन रद्द करण्यात येत आहे. त्याऐवजी 28 जून ते 11 जुलै 2021 या काळात या 134 व्या स्पर्धेचे आयोजन केले जाईल.

मुंबईमधील सर्वाधिक गर्दीचे ठिकाण, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी (Dharavi) येथे कोरोना विषाणूचा एक रुग्ण आढळला आहे. या रुग्णाचे वय 56 वर्षे असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या कुटुंबातील 8 ते 10 जणांना वेगळे ठेवण्यात आले आहे.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांच्या संख्येत सोमवार रात्रीपासून 33 नव्या रुग्णाची वाढ झाली आहे, यानुसार आता राज्यातील रुग्णांची एकूण संख्या 335 वर पोहचली आहे, याबाबत आरोग्य विभागाकडून माहिती देण्यात आली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहित कोव्हिड  लॉकडाऊनमुळे महसूल कमी झाल्याने लोकांना मोफत रेशन उपलब्ध करुन देण्यासाठी आणि इतर कल्याणकारी योजना चालू ठेवण्यासाठी 25,000 कोटींची आर्थिक मदत मागितली आहे.

Load More

चीन मधील वुहान शहरातून लागण झालेल्या कोरोना व्हायरसने जगातील सर्व देशांना पछाडले आहे. तर दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आणि मृतांच्या आकड्यात वाढ होत चालली आहे. आतापर्यंत कोरोना व्हायरसचे जगभरात 754,948 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 36,571 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती डब्लूएचओ (WHO) यांनी दिली आहे. चीन नंतर सर्वाधिक मृतांची संख्या इटली येथे आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच इटलीत मृतांचा आकडा 10 हजारावर पोहचल्याची माहिती समोर आली होती. त्याचसोबत 13 वर्षीय ब्रिटिश मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती AFP न्यूज ऐजंसी यांनी दिली आहे.

तर महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 302 वर जाऊन पोहचला आहे. राज्यातील सरकारकडून कोरोना व्हायरस विरोधात लढा देण्यासाठी विविध नियमांची अंमलबजावणी करत आहेत. तरीही कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत आहे. मात्र नागरिकांना घरी बसण्यास सांगितले असता ते सुद्धा घरी थांबण्याचे नाव घेत नाही आहेत. त्यामुळे आता अखेर पोलीस दलाकडून लॉकडाउनच्या परिस्थितीत नियमांचे उल्लंघन करण्याऱ्यांच्या विरोधात थेट कायदेशीर कारवाई केली जात आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.

तसेच महाराष्ट्रात सध्या तापमानात वाढ होत असून गरमीचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे या काळात थंड पेय पिणे टाळा. कारण कोरोना व्हायरसवर उपाय म्हणून नाही तर व्यक्तीला सर्दी किंवा खोकला झाल्यास चिंता अधिक वाढू शकते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडून नागरिकांना कोरोना व्हायरसंबंधित माहिती देत असतात. तर आज 1 एप्रिल असून कोरोना व्हायरस संबंधित एप्रिल फूल बनवण्याच्या नादात खोटी माहिती देणाऱ्याच्या विरोधात थेट कारवाई करण्यात येणार आहे.