Shamshera Box Office Collection Day 2: वीकेंड असूनही 'शमशेरा'ची अवस्था बिकट, दुसऱ्या दिवशी एवढ्या कोटींच झाल कलेक्शन
Shamshera (Photo Credit - Twitter)

रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) 'शमशेरा' (Shamshera) या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती, मात्र हा चित्रपट अपेक्षेप्रमाणे होताना दिसत नाही. तब्बल 4 वर्षांनंतर रणबीर मोठ्या पडद्यावर दिसला आहे. यशराज बॅनरच्या बिग बजेट चित्रपट 'शमशेरा'मधून तो परतला आहे. या चित्रपटात रणबीरसोबत वाणी कपूर (Vani Kapoor) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) मुख्य भूमिकेत आहेत. 'शमशेरा'च्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शननेच (Box Office Collection) सगळेच चकित झाले. पहिल्या दिवशी शमशेरा चित्रपटाची कमाई 'सम्राट पृथ्वीराज' पेक्षा कमी होती. सामान्यत: पहिल्या दिवसाच्या तुलनेत वीकेंडला चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये खूप वाढ होते, पण 'शमशेरा'ची कमाई किरकोळ वाढली. दुसऱ्या दिवशी चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट संघर्ष करताना दिसला. पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाच्या संकलनात थोडा फरक आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट केले की, आता चित्रपटाची शेवटची आशा रविवारच्या व्यवसायावर आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची संख्या फारशी वाढली नाही, ही चिंतेची बाब आहे.

 2 दिवसात 20 कोटींची कमाई

या चित्रपटाने 2 दिवसात 20 कोटींची कमाई केली आहे. दोन्ही दिवशी चित्रपटाची कामगिरी सारखीच होती. पहिल्या दिवशी चित्रपटाने 10.25 कोटींचा व्यवसाय केला होता, तर दुसऱ्या दिवशीही चित्रपटाने 10-10.25 कोटींचा व्यवसाय केला आहे. पहिल्याच दिवशी हा चित्रपट 15 कोटींचा व्यवसाय करेल, अशी अपेक्षा होती.

Tweet

शमशेरा सर्वधिक स्क्रीनवर प्रदर्शित 

22 जुलै रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटासाठी हे आकडे उत्साहवर्धक नाहीत कारण चित्रपटाचे बजेट 150 कोटी आहे. 'शमशेरा' हा कोरोना विषाणू महामारीनंतर सर्वाधिक स्क्रीन रिलीज झालेला चित्रपट आहे. तो 4350 स्क्रीन्सवर रिलीज झाला. यापूर्वी सम्राट पृथ्वीराज 3750, 83 ला 3741, सूर्यवंशी 3519, भूल भुलैया 2 ला 3200 आणि जयेशभाई जोरदार 2250 स्क्रीन्स मिळाले होते. (हे देखील वाचा: Emergency: काश्मिरी पंडितांनंतर अनुपम खेर साकारणार जय प्रकाश नारायण यांची भूमिका, फर्स्ट लूक आला समोर)

'शमशेरा' करत आहे संघर्षाचा सामना

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील हिंदी भाषिक प्रदेशातील काही केंद्रे वगळता चित्रपटाची कामगिरी सातत्याने खराब आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात फक्त 2.75 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आणि तमिळ आणि तेलुगूमध्ये डब करूनही हा चित्रपट दक्षिण भारतीय राज्यांमध्येही संघर्षाचा सामना करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करण मल्होत्रा ​​यांनी केले आहे. चित्रपटासाठी रविवारचा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे.