IPL 2022 मध्ये आता ‘या’ खेळाडूला रिटेन करण्यापूर्वी Mumbai Indians दोनदा विचार करेल, लिलावात नाही मिळणार जास्त भाव; माजी ओपनरचे गंभीर भाष्य
मुंबई इंडियन्स (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14 व्या हंगामातून पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघ प्लेऑफ सामन्यापूर्वीच बाहेर पडला आहे. शेवटच्या साखळी सामन्यात दमदार कामगिरी करूनही संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकला नाही. गेल्या वर्षी होणाऱ्या मेगा लिलावात (IPL Mega Auction) उतरण्यापूर्वी हार्दिक पंड्याचे (Hardik Pandya) नाव मुंबईने कायम ठेवलेल्या तीन खेळाडूंमध्ये असणार नाही असा विश्वास भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) व्यक्त केला आहे. मूल्यांकनावर आधारित सेहवागने सांगितले की मेगा लिलावात जाण्यापूर्वी मुंबई संघ कोणते तीन खेळाडू रिटेन करू शकतो. माजी सलामीवीराने स्पष्ट केले की कामगिरीवर अवलंबून संघ युवा कर्णधार ईशान किशन (Ishan Kishan) व्यतिरिक्त कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना कायम ठेवू शकतो. याशिवाय, संघ अन्य कोणाबाबत विचार करू शकत नाही. (IPL 2021, SRH vs MI: ‘खुद तो डूबे हैं सनम, तुमको भी...’ सनरायझर्सवर विजय मिळवूनही मुंबई इंडियन्स पराभूत, KKR ला प्लेऑफचं तिकीट)

“मला वाटते की मी ईशान किशन, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना कायम ठेवेन. ईशान त्यात लांबसाठी असेल असे दिसत आहे, वय त्याच्या बाजूने आहे जेणेकरून तो तुम्हाला अधिक चांगली सेवा देऊ शकेल. जर हार्दिक पांड्या गोलंदाजी करत नसेल तर मला वाटत नाही की तो लिलावात मोठी रक्कम मिळवू शकेल कारण त्याच्या दुखापतीमुळे प्रत्येकजण दोनदा विचार करेल.” हार्दिकने या मोसमात गोलंदाजी केली नाही आणि लवकरच तो परत गोलंदाजी करण्याची अपेक्षा केली जात असली तरी, त्याने इशानला 'अधिक' चांगला पर्याय मानला. “तो गोलंदाजी करेल की नाही? जर तो स्वत:ला तंदुरुस्त घोषित करू शकतो आणि गोलंदाजी सुरू करू शकतो तर संघ त्याला लिलावात खरेदी करू शकतात. ईशान किशनने आज ज्या प्रकारची कामगिरी केली आहे, त्याच्याकडून पुढील काळात आणखी बऱ्याच अपेक्षा कराव्यात कारण तो अव्वल फळीचा फलंदाज आहे, हार्दिक पांड्यासारखा नाही जो खालच्या फळीत फलंदाजी करतो,” सेहवाग पुढे म्हणाला.

दरम्यान, आयसीसी वर्ल्ड टी-20 स्पर्धेपूर्वी भारतीय राष्ट्रीय संघासाठी पांड्याची गोलंदाजी करण्यासाठी असमर्थता ही एक मोठी चिंतेची बाब आहे. लीगच्या साखळी सामन्यात मुंबईने स्टार खेळाडूचा अष्टपैलू म्हणून वापरला केला नाही. रोहितच्या मुंबई इंडियन्स शुक्रवारी प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरल्यानंतर 14 व्या हंगामातून बाहेर पडले आहेत.