
मुंबई: भारत-पाकिस्तान तणावामुळे आयपीएल 2025 (IPL 2025) स्थगित करण्यात आले होते, परंतु आता परिस्थितीत चांगली झाल्यामुळे ते पुन्हा सुरू होत आहे. आयपीएल 2025 17 मे पासून पुन्हा सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यात आरसीबी आणि केकेआर यांच्यात सामना होईल. आता आयपीएल 2025 चा अंतिम सामना 3 जून रोजी होणार आहे. आता इतर 2 संघांसाठी 'करो या मरो' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एका सामन्यातील पराभवामुळे, आयपीएल 2025 मधील या संघांचा प्रवास संपुष्टात येईल. (हे देखील वाचा: IPL 2025: मोठ्या संघाना बसणार फटका! उर्वरित आयपीएल सामन्यासाठी 'या' देशातील खेळाडूंना भारतात येणे कठीण)
'या' दोन्ही संघांवर टांगती तलवार
सध्या, जर आपण पॉइंट्स टेबलबद्दल बोललो तर गुजरात टायटन्स संघ पहिल्या स्थानावर आहे. याशिवाय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दुसऱ्या स्थानावर, पंजाब किंग्ज तिसऱ्या स्थानावर आणि मुंबई इंडियन्स चौथ्या स्थानावर आहे. याशिवाय, दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स अनुक्रमे पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. आता केकेआर आणि एलएसजीसाठी करा किंवा मरो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. केकेआरने 12 सामने खेळले आहेत, त्यापैकी 5 सामने जिंकले आहेत आणि 6 सामने गमावले आहेत. आता केकेआरचे 2 सामने शिल्लक आहेत, जर केकेआरने येथून 1 सामनाही गमावला तर ते आयपीएल 2025 मधून बाहेर पडेल. केकेआरचा पुढील सामना आरसीबीसोबत होणार आहे.
लखनौलापण बाहेर पडण्याचा धोका
दुसरीकडे, लखनौला आयपीएल 2025 मधून बाहेर पडण्याचा धोका देखील आहे. लखनौने आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत, त्यापैकी 5 सामने जिंकले आहेत आणि 6 मध्ये संघाला पराभव पत्करावा लागला आहे. सध्या, लखनौचे 3 सामने शिल्लक आहेत आणि ऋषभ पंतच्या संघाला ते सर्व जिंकणे आवश्यक आहे. लखनौ सुपर जायंट्सचा पुढील सामना 19 मे रोजी सनरायझर्स हैदराबादशी होईल. हैदराबाद आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहे, त्यामुळे एलएसजी हा सामना जिंकून प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवू इच्छित असेल.
'हे' स्पर्धेतुन संघ बाहेर
आतापर्यंत आयपीएल 2025 मधून 3 संघ बाहेर पडले आहेत. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांचा समावेश आहे. या हंगामात या तिन्ही संघांची कामगिरी खूपच खराब राहिली आहे.