Vande Mataram During India vs Malaysia Finals: भारताने सामन्यात पुनरागमन केल्यानंतर 'वंदे मातरम'च्या जयघोषाने दुमदमलं स्टेडियम (Watch Video)
भारतीय संघाने चौथ्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. आता भारत हा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी सर्वाधिक वेळा जिंकणारा देश बनला आहे.
चेन्नई येथे खेळल्या जात असलेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद भारतीय हॉकी संघाने पटकावले आहे. रोमहर्षक फायनलमध्ये भारत एका टप्प्यावर 3-1 ने पिछाडीवर होता, त्यानंतर टीम इंडियाने तिसऱ्या क्वार्टरमध्ये एका मिनिटात दोन गोल करत जबरदस्त पुनरागमन केले. चौथ्या क्वार्टरमधील चौथ्या गोलमुळे भारतीय संघाने चौथ्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. आता भारत हा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी सर्वाधिक वेळा जिंकणारा देश बनला आहे. पाकिस्तानने तीन वेळा हे विजेतेपद पटकावले आहे. दरम्यान भारताने सामन्यात पुनरागमन केल्यानंतर वंदे मातरमच्या जयघोषाने स्टेडियम भरून गेलं ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पहा व्हिडिओ
The chants of Vande Mataram fill the stadium after India comes back into the game. #HockeyIndia #IndiaKaGame #HACT2023 pic.twitter.com/Mn5ccxSG4A
— Hockey India (@TheHockeyIndia) August 12, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 12, 2023 10:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

