Ind vs Pak: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातील शेवटची दोन निर्णायक षटकं पाहण्यासाठी विमानाचं उड्डाण 5 मिनिटं उशीराने करण्यात आलं; अभिनेता आयुष्मान खुरानाने सोशल मीडियावर शेअर केला प्रसंग

आयुष्मान खुरानाने आपल्या ट्विटमध्ये सामन्यादरम्यान एक खास किस्सा सांगितला आहे. सामन्यातील शेवटच्या दोन षटकं पाहता यावी म्हणून विमानचं उड्डाण पाच मिनिटं उशीराने झाल्याचं अभिनेत्याने सांगितलं आहे.

Ind vs Pak: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातील शेवटची दोन निर्णायक षटकं पाहण्यासाठी विमानाचं उड्डाण 5 मिनिटं उशीराने करण्यात आलं; अभिनेता आयुष्मान खुरानाने सोशल मीडियावर शेअर केला प्रसंग
Ayushmann Khurrana (PC - Facebook)

Ind vs Pak: भारतीय लोकांची क्रिकेटची क्रेझ कोणापासून लपलेली नाही. बॉलिवूड स्टार्सही या खेळाचे मोठे चाहते आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू असताना आयुष्मान खुरानाने आपल्या ट्विटमध्ये सामन्यादरम्यान एक खास किस्सा सांगितला आहे. सामन्यातील शेवटच्या दोन षटकं पाहता यावी म्हणून विमानचं उड्डाण पाच मिनिटं उशीराने झाल्याचं अभिनेत्याने सांगितलं आहे.

या ट्विटमध्ये आयुष्मान खुरानाने म्हटलं आहे की, 'ही गोष्ट माझ्या पुढल्या पिढ्यांना मला सांगता येईल. मी भारत पाकिस्तान सामन्यातील शेवटची दोन षटकं मुंबई-चंदीगढ विमानामध्ये पाहिली. विमानाचे उड्डाण होण्याच्या काही मिनिटं आधी इतर प्रवाशीही त्यांच्या स्मार्टफोनला चिटकून असताना मी ही अशाच पद्धतीने शेवटची दोन षटकं पाहिली. मला विश्वास आहे की क्रिकेटचा चाहता असलेल्या वैमानिकाने मुद्दाम पाच मिनिटं उशीर केला. आणि विशेष म्हणजे कोणीही याबद्दल तक्रार केली नाही.'

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 24, 2022 11:54 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).