Watch: ‘राज्यात राष्ट्रपती राजवट का व कोणाच्या सांगण्यावरून लागली याचा खुलासा शरद पवार यांनी करावा’- Devendra Fadnavis
शरद पवार यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाने अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नाचा एक फायदा म्हणजे 2019 मध्ये महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट संपली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यावर उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर दिले. अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे पुतणे व राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापनेसाठी पाठिंबा दिला होता, असे फडणवीस म्हणाले होते. याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाने अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नाचा एक फायदा म्हणजे 2019 मध्ये महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट संपली.
पहाटेचा शपथविधी झाला नसता, तर महाराष्ट्रातून राष्ट्रपती राजवट हटली नसती आणि महाराष्ट्रातून राष्ट्रपती राजवट हटवली नसती तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते, असे शरद पवार म्हणाले. शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'शरद पवारांनी काही खुलासा केला हे चांगले आहे. आता माझी त्यांच्याकडून अशी अपेक्षा आहे की, राष्ट्रपती राजवट का लागली? कोणाच्या सांगण्यावरून लागली? याबाबतचा खुलासाही शरद पवार यांनी करावा.’
#DevendraFadnavis hits back at #SharadPawar , say he must also talk about why president rule was imposed#Maharashtra #MaharashtraPoliticalCrisis #देवेंद्रफडणवीस #शरदपवार pic.twitter.com/hpg6DJiqTL
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) February 22, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 22, 2023 07:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

