Sharad Pawar on Maharashtra Bandh: बदलापूर घटनेच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, मात्र त्यांच्या आवाहनानंतर त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. याप्रकरणी शुक्रवारी सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाने हा बंद बेकायदेशीर ठरवत, असे झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.

न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, ‘बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता. हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मा. उच्च न्यायालय , मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरूद्ध मा. सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन करण्यात येते.’ (हेही वाचा: Bombay HC on Maharashtra Bandh: महाविकास आघाडीला मोठा झटका; उद्याच्या 'महाराष्ट्र बंद'वर मुंबई उच्च न्यायालयाने घातली बंदी)

महाराष्ट्र बंद मागे घेण्याचे शरद पवार यांचे आवाहन-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)