Palghar Lynching Case: पालघरमधील साधूंच्या हत्येचा तपास सीबीआय करणार, महाराष्ट्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती
2020 मध्ये या घटनेचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीसाठी दोन याचिका प्रलंबित होत्या. त्याला आधीच्या उद्धव ठाकरे सरकारने विरोध केला होता.
Palghar Lynching Case महाराष्ट्रातील पालघरमध्ये (Palghar) दोन साधू आणि त्यांच्या चालकाच्या हत्येचा तपास महाराष्ट्र सरकार सीबीआयकडे (CBI) सोपवणार आहे. राज्य सरकारने ही माहिती सर्वोच्च न्यायालयाला (Supreme Court Of India) दिली आहे. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी बंद केली. 2020 मध्ये या घटनेचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीसाठी दोन याचिका प्रलंबित होत्या. त्याला आधीच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारने विरोध केला होता. आता नवीन शिंदे सरकारने (Shinde Govt.) तपास सीबीआयकडे सोपवण्याचे सांगितले आहे.
Maharashtra government informs the Supreme Court that it has decided to hand over to CBI the probe into the Palghar lynching case wherein two Sadhus were lynched to death. pic.twitter.com/4CRXFBOwAa
— ANI (@ANI) April 28, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 28, 2023 03:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

