शेतकऱ्यांन समर्पीत सरकार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी सन्मान योजना सुरु केली. या योजनेंतर्गत प्रत्येक शतकऱ्याच्या खात्यावर सहा हजार रुपये देण्याची योजना सुरु केली. आपलं सरकार आल्यावर याच योजनेसोबत प्रत्येक शेतकऱ्यास पीएम किसान योजनेप्रमाणेच सहा हजार रुपये देण्याचे जाहीर केले. म्हणजे शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या योजनेसोबत राज्य सरकारची योजना अशी एकूण 12,000 हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. राज्य सरकार बळीराजाच्या हिताचाच विचार करते आहे. कोणत्याही शेतकर्‍याचे धान घरी राहण्याची वेळ येऊ नये यासाठी धान खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्याचे जिल्हाधिकार्‍यांना आदेश देण्यात आल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)