यांनी अखेर उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. चंद्रहार पाटील यांनी सोशल मीडीयामध्ये पोस्ट शेअर करत हा निर्णय जाहीर केला आहे. लोकसभा निवडणूकीमध्ये सांगली च्या जागेवरून महाविकास आघाडी मध्ये तणाव निर्माण झाला होता. शिवसेना उबाठाने हट्टाने सांगलीची जागा स्वतःकडे ठेवत चंद्रहार पाटील यांच्या बाजूने उभं राहण्याची भूमिका निवडली पण आता चंद्रहार पाटील यांनी प्रत्यक्ष शासन सहभागाशिवाय अनेक गोष्टी होऊ शकत नसल्याने महायुती सरकार सोबत जाण्याचा निर्णय घेत असल्याचं म्हटलं आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून पक्ष प्रवेशाबाबत मला ऑफर आहे, असं काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं. आता त्यांनी थेट निर्णयच जाहीर केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)