मुंबई शहर आणि उपनगरांना दररोज पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या सात मुख्य जलाशयांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता विभागाने आज सकाळी ६ वाजेपर्यंत प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, सातही धरणांमध्ये मिळून एकूण साठवण क्षमतेच्या ८८.४१ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध झाला आहे.

पाणलोट क्षेत्रात सलग होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणीपातळीत वेगाने सुधारणा झाली आहे. या जलसाठ्यामुळे मुंबईवरील संभाव्य पाणीसंकटाची चिंता दूर झाली असून आगामी वर्षासाठी मुबलक पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)