अवघ्या काही दिवसांवर आषाढी एकादशी येऊन ठेपली आहे, अशात आता राज्यातून निघालेल्या पालख्यांना पंढरपूरची ओढ लागली आहे. तब्बल 2 वर्षानंतर आषाढी वारी होत असल्याने वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. 21 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आळंदीहून प्रस्थान झाले होते. गेले तीन दिवस पालखी सातारा जिल्ह्यात होती. आता आज संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीला सातारा प्रशासनाने निरोप दिला. त्यानंतर श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोमवार 4 जुलै रोजी दुपारी 11 वाजून 45 मिनिटांनी सोलापूर जिल्ह्यात कारुंडे येथे आगमन झाले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)