Kanpur Crime: कानपूरमध्ये पाणीपुरी खाण्यावरून झाला विवाद, दोन गटाकडून गोळीबार, 6 जण जखमी
बुधवारी सायंकाळी राणीया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजेंद्र चौकात एका हातगाडीजवळ पाणीपुरी खाण्यावरून दोन पक्षांमध्ये मारामारी झाली
कानपूरमध्ये पाणीपुरी खाण्यावरून असा वाद झाला की गोळ्या झाडल्या गेल्या आणि डझनहून अधिक लोक जखमी झाले. बुधवारी सायंकाळी राणीया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजेंद्र चौकात एका हातगाडीजवळ पाणीपुरी खाण्यावरून दोन पक्षांमध्ये मारामारी झाली. रिपोर्टनुसार, वादानंतर काही वेळाने एका बाजूच्या लोकांनी दुसऱ्या बाजूच्या दुकानावर हल्ला केला, ज्यामध्ये जोरदार दगडफेक झाली आणि लाठ्यांचाही वापर करण्यात आला. दरम्यान, छतावर असलेल्या घरमालकानेही आपल्या परवाना असलेल्या बंदुकीतून गोळीबार सुरू केला. या वादात दोन्ही बाजूचे अनेक जण जखमी झाले असून, कोणीही गंभीर जखमी नसल्याचा दावा पोलिस करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली.
पाहा पोस्ट -
Never a dull day in UP.
After the famous Baghpat "war" over "chaat", two groups in UP's Kanpur clashed following altercation while having "golgappas". One group resorted to massive stone-pelting while a person from the rival group could be seen firing from the terrace. pic.twitter.com/7py4a6RtS2
— Piyush Rai (@Benarasiyaa) May 24, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 24, 2024 10:25 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

