Delhi: सीबीएसई बोर्डाने शुक्रवारी परीक्षेचा निकाल जाहीर केला. त्यानंतर देशातील अनेक राज्यांतून विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या येत आहेत. दिल्लीतील सुलतानपुरी येथील 19 वर्षीय तरुणीने 12वी CBSE बोर्डाच्या परीक्षेत नापास झाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. विद्यार्थिनीकडून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. ही विद्यार्थीनी परीक्षेत नापास झाल्याचे सांगण्यात येत आहे. निकाल आल्यानंतर विद्यार्थीनी तणावाखाली होती. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. (हेही वाचा - Delhi Shocker: 12वी निकालाच्या नैराश्यातून एका 16 वर्षीय मुलीची आत्महत्या)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)