Mumbai Weather Forecast: मुंबई मध्ये पुढील काही दिवस बिनपावसाचे; कोरड्या वातावरणासह उकाडा वाढण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून पावसाने मुंबईत विश्रांती घेतली असून लक्ख सुर्यप्रकाश दिसत आहे. त्यामुळे तापमानात वाढ होत असून उकाडा वाढत आहे. त्यामुळे तापमानात वाढ होत असून उकाडा वाढत आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने मुंबईत विश्रांती घेतली असून लक्ख सुर्यप्रकाश दिसत आहे. त्यामुळे तापमानात वाढ होत असून उकाडा वाढत आहे. दिवसा कमी पाऊस, संध्याकाळी ढगाळ वातावरण होऊन हलका पाऊस बरसत आहे. गेल्या 4-5 दिवसांपासून वातावरणात झालेला हा बदल पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचे मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक (Dy Director General of Meteorology) के.एस.होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे. दरम्यान या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी मुंबईकरांना केले आहे.
6 सप्टेंबर पासून पावसाचा जोर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागांत वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. तर मुंबईत कोरडे वातावरण अनुभवायला मिळेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
K S Hosalikar Tweet:
मुंबईमध्ये सध्या तापमान वाढ जाणवत असून उकाडा पण जास्त आहे.गेल्या 4,5 दिवसात कमी पाऊस, दिवसा लक्ख ऊन, संध्याकाळी ढगाळ आकाश, गडगडाटासह पाउस असून, त्याचा एकत्रित परिणाम जाणवत आहे
वातावरणातील ह्या अचानक बदलाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. वातावरण असेच पुढचे काही दिवस असण्याची शक्यता
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 5, 2020
यंदा महाराष्ट्रात सर्वत्र चांगला पाऊस झाला. निसर्ग चक्रीवादळानंतर जुलै, ऑगस्ट महिन्यात मुसळधार पावसाने मुंबईसह राज्याला झोडपून काढले. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले. परंतु, धरण, तलाव क्षेत्रात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट टळले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Sep 05, 2020 01:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

