Maharashtra Gram Panchayat Election 2022: महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान, उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद, 20 डिसेंबरला मतमोजणी
Gram Panchayat | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून 7,751 गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. थेट सरपंचपद (Sarpanch Election) आणि ग्रामपंचायत निवडणुकीसाठी हे मतदान Gram Panchayat Voting) आज (18 डिसेंबर) पार पडते आहे. आज झालेल्या मतदानाची मतमोजणी सोमवारी म्हणजेच (19 डिसेंबर) रोजी पार पडणार आहे. गावगाड्याची किल्ली कोणाच्या हातात द्यायची याबाबत गावकरी आज अंतिम निर्णय घेणार आहेत गावकऱ्यांचा निर्णय काय हे उद्या कळणार आहे.

कोणकोणत्या जिल्ह्यात किती ग्रामपंचायतींसाठी निवडणूक?

अहमदनगर- 203

अकोला- 266

अमरावती- 257

औरंगाबाद- 219

बीड- 704

भंडारा- 363

बुलडाणा- 279

चंद्रपूर- 59

धुळे- 128

गडचिरोली- 27

गोंदिया- 348

हिंगोली- 62

जळगाव- 140

जालना- 266

कोल्हापूर- 475

लातूर- 351

नागपूर- 237

नंदुरबार- 123

उस्मानाबाद- 166

पालघर- 63

परभणी- 128

पुणे- 221

रायगड- 240

रत्नागिरी- 222

सांगली- 452

सातारा- 319

सिंधुदुर्ग- 325

सोलापूर- 189

ठाणे- 42

वर्धा- 113

वाशीम- 287

यवतमाळ- 100

नांदेड- 181

नाशिक- 196

एकूण- 7,751

(हेही वाचा, Elections for Gram Panchayats: राज्यातील 7750 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर; 18 डिसेंबरला मतदान, 20 डिसेंबर मतमोजणी)

दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर पोलीसफाटा तैनात करण्या आला आहे. प्रामुख्याने संवेदनशिल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावांमध्ये अधिक प्रमाणावर सुरक्षा कर्मचारी तौनात करण्यात आले आहेत. दरम्यान, नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल.