Maharashtra: महाराष्ट्रातील मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे आठवडाभरात 10 जणांचा मृत्यू
photo credit -x

Maharashtra: महाराष्ट्रातील मराठवाडा विभागात 9 एप्रिलनंतर एका आठवड्यात अवकाळी पावसामुळे 10 लोक आणि 150 जनावरे मरण पावली आहेत. राज्याच्या महसूल विभागाने तयार केलेल्या प्राथमिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. मराठवाड्यात छत्रपती शिवाजी नगर, जालना, बीड, परभणी, लातूर, नांदेड, धाराशिव आणि हिंगोली या आठ जिल्ह्यांचा समावेश आहे. अहवालात म्हटले आहे की, 9 एप्रिलपासून मराठवाड्यातील विविध भागात अनेक वेळा अवकाळी पाऊस झाला असून त्यामुळे अनेक माणसे आणि जनावरे मृत्युमुखी पडली असून, पाऊस आणि गारपिटीमुळे या भागातील 481 गावांतील 450 घरांचे नुकसान झाले आहे.

अहवालात म्हटले आहे की, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 9,127 शेतकऱ्यांच्या 5,256.86 हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अहवालानुसार, “9 एप्रिलपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीने 10 जणांचा बळी घेतला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. बीड जिल्ह्यात सर्वाधिक तीन, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि लातूर जिल्ह्यात प्रत्येकी दोन तर हिंगोलीत एकाचा मृत्यू झाला.

या अहवालात 117 दुभत्या जनावरांसह 152 जनावरांचा अवकाळी पावसामुळे मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.