Kalyan Crime: तंबाखू विकण्यावरून फेरीवाल्यांमध्ये वाद, एकावर चाकूने वार करत काढला पळ, आठ तासातच दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
चार फेरीवाले तंबाखू (Tobacco) विकण्यावरून भांडले होते. दोघांपैकी एकाने दुसऱ्यावर चाकूने वार केल्यानंतर त्यांच्यातील भांडण संपले. फेरीवाला गंभीर जखमी असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना जीआरपीने (GRP) ताब्यात घेतले तर तिसरा आरोपी फरार आहे.
कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शार्दुल वाल्मिकी म्हणाले, आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. पण आम्ही त्यांना अटक करण्यासाठी एक टीम तयार केली आणि आठ तासांच्या आत आम्ही दोन आरोपींना अटक केली. तर तिसरा अद्याप फरार आहे. ते सर्व ट्रेनमध्ये तंबाखू विकणे आणि बोगी ठरवण्यावरून लढले. त्यांच्यात पूर्वीचे मतभेद देखील होते, ज्यामुळे भांडण आणि अखेरीस हल्ला झाला. पीडित रुग्णालयात दाखल असताना आम्ही तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहोत.
(The above story first appeared on LatestLY on Oct 16, 2021 10:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

