परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर गृहमंत्री Anil Deshmukh यांच्या राजीनाम्याची मागणी; जाणून घ्या काय म्हणत आहे महाराष्ट्रातील नेते (See Tweets)
Home Minister Anil Deshmukh | Photo Credits: ANI)

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्राचे गृहमंत्री देशमुख यांनी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना दरमहा 100 कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते. या दाव्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. आता हा मुद्दा पकडून विरोधी पक्षाने हल्लाबोल करत अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, राज ठाकरे, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर अशा अनेक नेत्यांनी ट्वीट करत अनिल देशमुख यांच्यावर टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस - 

चंद्रकांत पाटील -

आशिष शेलार -

प्रवीण दरेकर -

अतुल भातखळकर- 

राज ठाकरे -

(हेही वाचा: गृहमंत्री Anil Deshmukh यांनी Sachin Vaze ला दिले होते महिन्याला 100 कोटी गोळा करण्याचे टार्गेट; माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचा आरोप, जाणून घ्या अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया)

पत्रात पुढे म्हटले आहे की, गृहमंत्री म्हणले होते की, मुंबईत 1750 हून अधिक बार, रेस्टॉरंट्स आहेत. प्रत्येकाकडून 2-3 लाख रुपये घेतले तरी महिन्यात 40-50 कोटी जमा होतील. याखेरीज उर्वरित रक्कम इतर ठिकाणाहून वसूल करण्यास सांगितले होते. यावर अनिल देशमुख यांनी, परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला असल्याचे म्हटले आहे.