राज्यातील सरकारी, महापालिका रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी चाचणी, उपचार व जेवणाची सुविधा मोफत, राज्य सरकारचा निर्णय

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या परिस्थिती काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचसोबत घरात थांबून कोरोनाच्या विरोधात लढा देण्याचे आवाहन सरकारने केले आहे.

राज्यातील सरकारी, महापालिका रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी चाचणी, उपचार व जेवणाची सुविधा मोफत, राज्य सरकारचा निर्णय
Screening for coronavirus | Representational image | (Photo Credits: PTI)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या परिस्थिती काळजी घेणे आवश्यक आहे. त्याचसोबत घरात थांबून कोरोनाच्या विरोधात लढा देण्याचे आवाहन सरकारने केले आहे. दुसऱ्या बाजूला कोरोनाबाधित रुग्णांवर डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून अहोरात्र उपचार करण्यात येत आहेत. तर दिवसागणिक नव्या कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने त्यांची चाचणी करण्यापासून ते उपचारापर्यंत सर्व गोष्टींकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. याच पार्श्वभुमीवर आता राज्य सरकारने सरकारी, महापालिकांच्या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांच्या चाचण्या, उपचार आणि जेवणाची सोय मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधित रुग्णांना दिलासा मिळणार आहे.

वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी असे म्हटले आहे की, कोरोनाबाधित रुग्णांच्या चाचण्यांसाठी आता टेस्ट लॅबची संख्या वाढवण्यात आली आहे. तर आता वैद्यकिय महाविद्यालयांत सुद्धा कोरोनाची चाचणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते.सध्या 40 खासगी लॅब असून त्यांची संख्या वाढवून 60 ऐवढी केली जाणारर आहे. या लॅबमधून दिवसाला 7 हजार चाचण्या केल्या जाणार आहेत. त्याचसोबत केंद्र सरकारने अधिक प्रमाणात टेस्ट किट राज्याला पुरवल्या पाहिजेत असे ही अमित देशमुख यांनी म्हटले आहे. त्याचसोबत नागरिकांनी त्यांच्या मध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास तातडीने त्यासंबंधित चाचणी करुन घ्यावी असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.(कोरोना विषाणूबद्दल माहिती: पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी 4 जणांना Coronavirus ची लागण; शहरातील बाधितांच्या संख्या 89 वर पोहचली)

 दरम्यान, कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतेही औषध उपलब्ध नाही. मात्र राज्यातील डॉक्टर सध्या प्लाझ्मा थेरपीचा वापर करुन कोरोनाबाधितांवर उपचार करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचसोबत कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती सुधारल्यानंतर डिस्चार्ज देण्यात येत आहे. पण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांना होम क्वारंटाइनचा सल्ला ही दिला जात असून त्याचे पालन करावे अशी सुचना ही दिली जात आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 8 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती नागरिकांनी गांभीर्याने घ्यावी.

(The above story first appeared on LatestLY on Apr 27, 2020 08:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).