क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांची 199 वी जयंती शनिवार, 11 एप्रिल 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाचे जनक आणि थोर समाजसुधारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महात्मा फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य समता आणि न्यायासाठी वेचले. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार समाजाला प्रेरणा देण्यासाठी आणि दिशा दाखवण्यासाठी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जातात. यंदाच्या जयंतीनिमित्त आपण त्यांचे काही गाजलेले विचार पाहणार आहोत.
शिक्षणाचे महत्त्व सांगणारे प्रेरणादायी विचार
महात्मा फुले यांनी शिक्षणाशिवाय प्रगती शक्य नाही, हे अत्यंत प्रभावीपणे मांडले होते. त्यांचे खालील विचार आजही तितकेच लागू होतात:
"विद्येविना मती गेली, मतिविना नीती गेली, नीतिविना गती गेली, गतिविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले."

"शिक्षण ही अशी शक्ती आहे, जी माणसाला गुलामीतून मुक्त करू शकते."

"ज्ञान हे जगातील सर्वात मौल्यवान रत्न आहे, जे कोणीही चोरू शकत नाही."

"स्वार्थ वेगवेगळी रूपं धारण करतो, कधी धर्माचा तर कधी जातीचा; मात्र खरा धर्म माणुसकी हाच असायला हवा."

"अन्यायाविरुद्ध लढणे हे केवळ कर्तव्य नसून तो एक अधिकार आहे."
"जोपर्यंत समाजात उच्च-नीच असा भेदभाव आहे, तोपर्यंत देशाची प्रगती होणे अशक्य आहे."

महात्मा फुले यांचे हे विचार केवळ शब्दांपुरते मर्यादित नसून, ते एका उज्ज्वल भविष्याचा पाया आहेत. त्यांच्या १९९ व्या जयंतीनिमित्त हे विचार घराघरात पोहोचवणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.