मुंबई: भारतीय इतिहासातील देदीप्यमान पर्व आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३ एप्रिल रोजी पुण्यतिथी. साडेतीनशे वर्षांनंतरही महाराजांचे विचार आणि त्यांचे कार्य महाराष्ट्राच्या अंगांगात भिनलेले आहे. आजच्या दिवशी संपूर्ण राज्यभरातून शिवरायांच्या स्मृतींना उजाळा दिला जात असून, विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे.

रायगड किल्ल्यावर विशेष सोहळा

शिवाजी महाराजांनी ३ एप्रिल १६८० रोजी किल्ले रायगडावर आपला देह ठेवला. त्यामुळे दरवर्षी रायगडावर या दिनाचे विशेष महत्त्व असते. पहाटेपासूनच शिवभक्तांनी रायगडावर गर्दी केली असून, महाराजांच्या समाधी स्थळावर पुष्पवृष्टी आणि अभिषेक करण्यात येत आहे. "प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, योगीराज, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय" या जयघोषाने रायगडचा परिसर दुमदुमून गेला आहे.

डिजिटल युगातही शिवविचारांचा जागर

आजच्या सोशल मीडियाच्या युगात व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर शिवरायांच्या शौर्यगाथांचे संदेश मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. 'निश्चयाचा महामेरू, खूप जनांसी आधारू' अशा शब्दांतून लोक आपल्या भावना व्यक्त करत आहेत. केवळ महाराष्ट्रच नाही, तर देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि परदेशातील मराठी बांधवांकडूनही महाराजांना डिजिटल माध्यमांतून आदरांजली वाहिली जात आहे.

Shivaji Maharaj Punyatithi Quotes In Marathi
Shivaji Maharaj Punyatithi Messages In Marathi
Shivaji Maharaj Punyatithi Caption In Marathi
Shivaji Maharaj Punyatithi Status In Marathi

शिवरायांचा वारसा आणि आजची पिढी

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक राजा नव्हते, तर ते एक प्रगत विचारवंत आणि कुशल प्रशासक होते. त्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले आणि रयतेला सुखाचे दिवस दाखवले. आजच्या पिढीला महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्याची आणि गनिमी काव्याची ओळख करून देण्यासाठी ठिकठिकाणी व्याख्याने आणि पोवाड्यांचे आयोजन करण्यात आले आहे.