Farmers Brought Down From Mobile Tower: मोबाईल टॉवरवर चढलेल्या शेतकऱ्यांना खाली उतरविण्यात यश (Watch Video)
Tamil Nadu Farmers Protest | (Photo Credit - X)

मोबाई टॉवरवर (Mobile Tower) चढून आपला संताप व्यक्त करणाऱ्या शेतकऱ्यांना खाली उतरविण्यात यश आले आहे. तामिळनाडू राज्यातील शेतककरी दिल्ली येथील जंतरमंतरवर आंदोलन (Farmers Protest in Delhi) करत आहेत. हे आंदोलन करताना त्यातील काही शेतकरी मोबाईल टॉवरवर (Farmers Brought Down From Mobile Tower) चढले. ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली. नागरी सुरक्षा, शेतकऱ्यांच्या जीविताची काळजी यांसारखे प्रश्न या घटनेमळे निर्माण झाले होते. दरम्यान, प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने या शेतकऱ्यांना खाली उतरवले.

विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

प्राप्त माहितीनुसार, तामिळनाडू राज्यातील जवळपास 200 हून अधिक शेतकरी राजधानी दिल्ली येथे जमले. तेथे त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. त्यासाठी ते मोबाईल टॉवरवर चढले. या मागण्यांमध्ये प्रामुख्याने शेतमालाला मिळणारा कवडीमोल भाव, नद्यांबाबत केंद्र सरकारचे धोरण, सातत्याने वाढत चाललेले खतांचे दर, शेतमालास बाजारात असणारी मागणी आणि होणारा पुरवठा, त्यासाठी केंद्र सरकारने अंगीकारलेले आयात-निर्यातीचे धोरण या सर्व मुद्द्यांचा समावेश आहे. याच मुद्द्यांवरुन हे शेतकरी केद्र सरकारचे लक्ष वेधून घेऊ इच्छितात. (हेही वाचा, Farmers Climbed Atop Mobile Tower Video: शेतकरी चढले मोबाईल टॉवरवर; तामिळनाडू येथील बळीराजाचे दिल्ली येथील जंतरमंतरवर निदर्शने; व्हिडिओ व्हायरल)

केंद्र सरकारचा तीव्र निषेध

दरम्यान, आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष जावे आणि ते जनतेपर्यंतही पोहोचावेत यासाठी हे शेतकरी विविध मार्गाचा अवलंब करत आहेत. मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणे हा मार्गही त्यापैकीच एक आहे. मोबाईल टॉवरवर चढणे हे जीविताच्या दृष्टीने धोकादायक असले तरीही, या शेतकऱ्यांनी तो मार्ग अवलंबला हे विशेष. या मार्गासोबच शेतकऱ्याने हाडे, मानवी कवट्या गळ्यात घालूनही केंद्र सरकारचा निशेध नोंदवला आहे. या आंदोलनात हे शेतकरी सरकारविरोधी घोषणा आणि शेतकरी एकजूटीचा विजय असो हा नारा, यांसारख्या बाबींचा समावेश आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात पूर्णपणे अपयशी आल्याचा या शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे विविध मागण्यांसाठी हे शेतकरी आंदोलन करत आहेत. (हेही वाचा, Girl Climbs Mobile Tower Video Viral: बॉयफ्रेंडने दिला धोका, तरुणीचा मोबाईल टॉवरवर चढून 'शोले स्टाईल' ड्रामा; व्हिडिओ व्हायरल)

शेतकरी पुन्हा आक्रमक

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसल्याचा आरोप आंदोलक करत आहे. देशभरात सध्या लोकसभा निवडणूक 2024 सुरु आहे. दरम्यान, या आधी सन 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही तत्कालीन केंद्र सरकारने शेतकऱ्यांना अनेक आश्वासने दिली होती. मात्र, त्यापैकी कोणतेच आश्वासन या सरकारने पूर्ण केले नाही. त्यातच हे सरकार पुन्हा एकदा तीच आश्वासने घेऊन लोकांसमोर येत आहे. यावरुन शेतकरी आक्रमक आहेत. शेतकऱ्यांनी केंंद्र सरकारला ईशारा दिला आहे की, अजूनही वेळ गेली नाही. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहावे, अन्यथा हा लढा कायम सुरुच राहील, असे हे शेतकरी म्हणत आहेत. (हेही वाचा, Punjab: काय सांगता? नोकरीसाठी तरुणाचे 200 फुट टॉवरवर 135 दिवस आंदोलन; शेवटी सरकारकडून मागण्या मान्य (Watch Video)

व्हिडिओ

दरम्यान, दिल्ली काय किंवा वाघा बॉर्डर काय, शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याची ही पहिलीच वेळ नव्हे. या आधीही अनेक वेळा शेतकऱ्यांनी आंदोलने केली आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनावर सरकारने कोणतीही प्रतिक्रिया न देता केवळ बघ्याची भूमिका घेतली. इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांच्या आंदोलनावर विविध आरोप करत आंदोलनासाठी जमलेल्या शेतकऱ्यांवर अश्रुधुरांचा माराही केल्याचे या देशाने पाहिले. त्यामुळे तामिळनाडूतून दिल्ली येथे आलेल्या आणि मोबाईल टॉवरवर चढलेल्या शेतकऱ्यांबाबत केंद्र सरकार काय विचार करते याबाबत उत्सुकता आहे.