
Ahmedabad Plane Crash: एअर इंडियाच्या विमानाला अपघात होऊन आठवडा उलटला आहे. परंतु, अद्याप देशातील लोक हा अपघात विसरू शकलेले नाहीत. गुजरात आरोग्य विभागाने शुक्रवारी 220 बळींचे डीएनए जुळले असल्याचं सांगितलं आहे. यापैकी 202 मृतदेह औपचारिकपणे कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले आहेत. तथापी, आतापर्यंत कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आलेल्या मृतदेहांपैकी 15 जणांचे मृतदेह विमानाने नेण्यात आले तर बहुतेक 187 जणांचे मृतदेह रस्त्याने रुग्णवाहिकेद्वारे संबंधित ठिकाणी पाठवण्यात आले. आरोग्य मंत्री ऋषिकेश पटेल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X द्वारे याबाबत अपडेट शेअर केले आहे. तसेच त्यांनी उर्वरित अवशेष योग्य ओळख पटवल्यानंतर आणि औपचारिकता पूर्ण केल्यानंतर लवकरच सुपूर्द केले जातील, असं आश्वासन दिलं आहे.
दरम्यान, शोकाकुल कुटुंबांना मदत व्हावी यासाठी फॉरेन्सिक टीम, आपत्ती प्रतिसाद युनिट आणि राज्य अधिकारी समन्वयाने काम करत आहेत. 12 जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान एआय-171 अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही क्षणांतच कोसळले. या अपघातात विमानातील 242 पैकी 241 जणांना आपला जीव गमवावा लागला. याशिवाय विमान ज्या ठिकाणी कोसळले त्या ठिकाणी 34 जणांचा मृत्यू झाला. (हेही वाचा - Air India कडून 16 इंटरनॅशनल रूटस वर 15 जुलै पर्यंत विमानं सेवा तात्पुरती कमी, 3 ठिकाणची विमान रद्द; पहा यादी)
ऋषिकेश पटेल यांची एक्स पोस्ट -
Summary of Mortal Remains
UPDATED UP TO :- 20/06/2025 , 11:45 A.M.
NO. OF DNA MATCH - 220
NO. OF RELATIVES CONTACTED- 220
NO. OF MORTAL RELEASED- 202
..........
Indians 151
Portuguese 7
British 34
Canada 1
Non passengers 9
.........
BY AIR - 15
By road via ambulance -…
— Rushikesh Patel (@irushikeshpatel) June 20, 2025
एअर इंडियाच्या अपघाताचा परिणाम विनाशकारी होता, विमान संपर्कात असताना त्याचे तुकडे झाले. तसेच मृतदेह गंभीरपणे जळाले होते, त्यामुळे मृतांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणीची करण्यात येत आहे. अहमदाबाद येथील विमान अपघात भारताच्या इतिहासातील सर्वात प्राणघातक विमान अपघातांपैकी एक आहे, ज्यामुळे देशभरात शोककळा पसरली.
गुरुवारी मुंबईतील शेकडो लोकांनी दुर्घटनाग्रस्त बोईंग ड्रीमलायनर विमानाचे सह-वैमानिक क्लाईव्ह कुंदर यांना अंतिम निरोप दिला. कुंदर यांच्यावर शिवडी ख्रिश्चन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळी कुंदर यांचे पार्थिव अहमदाबादहून मुंबई विमानतळावर आणण्यात आले आणि तेथून ते त्यांच्या मूळ गावी गोरेगाव येथे नेण्यात आले. येथे कुटुंबातील सदस्य, मित्र आणि स्थानिक लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.