IPL ची निंदा करणाऱ्या माजी क्रिकेटपटूंना R Ashwin याने दिले जशास तसे उत्तर! टी-20 लीगला विनाकारण दोष दिल्याचा केला दावा
रविचंद्रन अश्विन (Photo Credit: Instagram)

भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) माजी क्रिकेटपटूंना फटकारले जे सतत दावा करतात की आयपीएल (IPL) हे त्यांच्या राष्ट्रीय संघांच्या अपयशाचे एक कारण आहे. अलीकडेच, ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन म्हणाला की खेळाडूंनी ऑस्ट्रेलियापेक्षा आयपीएल खेळण्यास प्राधान्य देऊ नये. याशिवाय, माइकल आथर्टन यांच्यासारखे अनेक माजी इंग्लिश क्रिकेटपटूंनी आयपीएलला कसोटीत इंग्लंडच्या खराब कामगिरीचे कारण ठरवले. इंडियन प्रीमियर लीगची (Indian Premier League) 2022 आवृत्ती 26 मार्चपासून सुरु होणार आहे, तर तिम सामना 29 मे रोजी खेळला जाईल. लीग माजी क्रिकेटपटूंच्या निशान्यावर असताना, विशेषतः इंग्लंडच्या ऍशेस पराभवानंतर, एका पत्रकाराने या दरम्यान आयपीएल विंडो वर्षाचा 1/6 वा भाग व्यापून घेईल असे म्हणत लीगवर संघाच्या पराभवाचे खापर फोडले. (IPL 2022 Mega Auction: रविचंद्रन अश्विनसाठी राजस्थान रॉयल्सची 5 कोटींची बोली)

गेल्या काही महिन्यांत आयपीएलवर झालेल्या टीकेबद्दल त्याच्या यूट्यूब चॅनेलवर तपशीलवार बोलताना रविचंद्रन अश्विन म्हणाला की, लीगच्या विस्तारामुळे खेळाडूंची उपलब्धता ही या वर्षी फ्रँचायझींना होणार मोठं नुकसान असेल. लक्षात घ्यायचे ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, इंग्लंड यांसारखे खेळाडू आपापल्या संघांच्या सामन्यांमध्ये सहभागी होणार आहेत आणि लीग सुरू झाल्याच्या किमान 10 दिवसांनी खेळण्यास उपलब्ध होणार आहेत. “परंतु, बहुतेक दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड संघाचे आंतरराष्ट्रीय सामने आयपीएलच्या वेळापत्रक आधारित आहेत. यावर्षी आयपीएल दरम्यान न्यूझीलंडचे कोणतेही आंतरराष्ट्रीय सामने होणार नाहीत.” अश्विन म्हणाला, “आयपीएल गेल्या अनेक वर्षांपासून रडारखाली आहे. अचानक काही माजी क्रिकेटर विनाकारण आयपीएलबद्दल काहीतरी वाईट बोलतील. 2008 किंवा 2010 मधील परिस्थितीची कल्पना करा. टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भारतीय सेटअपमध्ये फक्त 20-25 क्रिकेटर्स होते.”

“इंग्लिश पत्रकार लॉरेन्स बूथ यांनी आयपीएल सामन्यांबद्दल ट्विट केले होते की याला वर्षाचा एक तृतीयांश (एक-सहावा) वेळ लागतो. इंग्लिश प्रीमियर लीग देखील घडते आणि याला जवळजवळ सहा महिन्यांची विंडो असते. खेळाडूंच्या सामन्यांमध्ये अधिक अंतर असेल आणि त्यांच्याकडे आठवड्यातून फक्त एक किंवा दोन सामने असतील. अर्थात, क्रिकेट या टप्प्यावर पोहोचणे हे नेहमीच मोठे प्रश्नचिन्ह राहणार आहे. पण एक लीग म्हणून आयपीएलमध्ये क्रिकेटला त्या टप्प्यावर नेण्याची सर्व क्षमता नक्कीच आहे. आणि सर्व क्रिकेट प्रेक्षक, क्रिकेट राष्ट्रे, भागधारकांना हे आधीच माहित आहे,” अश्विन म्हणाला.