IPL 2021: विराट कोहलीच्या RCB चे कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयामागे आहेत दोन मोठी कारणे, वाचा सविस्तर
विराट कोहली (Photo Credit: PTI)

आगामी टी-20 विश्वचषक आणि इंडियन प्रीमियर लीगची (Indian Premier League) सध्याची आवृत्ती पूर्ण झाल्यानंतर भारतीय टी-20 संघ (India T20 Team) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे  (Royal Challengers Bangalore) कर्णधारपद सोडण्याच्या विराट कोहलीच्या (Virat Kohli) निर्णयामुळे क्रिकेट जगताला धक्का बसला. या दरम्यान कोहलीने शेवटी या मुद्द्यावर आपले मौन मोडले आहे आणि असा दावा केला आहे की त्याच्या कामाचा ताण व्यवस्थापित करणे हा निर्णयातील सर्वात मोठा घटक आहे. भारतीय कर्णधाराने तो जे काही करत आहे त्याला 120% देऊ शकतो याची खात्री करण्यासाठी त्याच्या समर्पणाबद्दल बोलला. स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत कोहली म्हणाला, “सर्वप्रथम कामाचा ताण हा मुख्य घटक होता आणि मला माझ्या जबाबदारीच्या बाबतीत अप्रामाणिक व्हायचे नव्हते. जर मी एखाद्या गोष्टीला 120% देऊ शकत नाही, तर मी एखाद्याला धरून ठेवणारा नाही, मी नाही अशाच गोष्टींशी जोडलेलो आणि ते माझ्या मनात नेहमीच स्पष्ट होते.” (IPL 2021, RCB vs KKR Eliminator: एलिमिनेटर सामन्यापूर्वी वनिंदू हसरंगा आणि दुशमंथा चमीरा यांनी सोडली ‘विराटसेने’ची साथ)

2013 च्या हंगामात कोहलीने आरसीबीच्या कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली जेव्हा डॅनियल व्हिटोरी या पदावरून पायउतार झाला. विराटच्या कारकिर्दीत RCB ने 2016 मध्ये अंतिम फेरीसह चार वेळा प्लेऑफ गाठली आहे. 34 वर्षीय खेळाडू RCB कर्णधार फ्रेंचायझीच्या विजेतेपदाचा दुष्काळ संपवून आणि इतिहासातील पहिले विजेतेपद मिळवून कॅप्टन म्हणून आपला कार्यकाळ संपवण्याच्या प्रयत्नात असेल. पुढील हंगामात तो कर्णधार होणार नाही, पण कोहलीने पुष्टी केली की तो जोपर्यंत तो खेळत राहील तोपर्यंत तो आरसीबी खेळाडू राहील. यामुळे आयपीएल 2022 च्या मेगा-लिलावापूर्वी त्याला तीन वेळचा उपविजेता संघ पुढील वर्षी देखील संघात रिटेन करेल. राष्ट्रीय संघाचे टी -20 कर्णधार म्हणून कोहलीची अंतिम स्पर्धा युएई आणि ओमानमध्ये आगामी टी-20 विश्वचषक असेल. भारत 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध मोहिमेला सुरुवात करेल.

विराटच्या नेतृत्वात आरसीबीने कधीही आयपीएलचे जेतेपद पटकावले नाही, पण संघाला गेल्या दोन वेळा प्ले ऑफमध्ये पोहोचण्यात यश आले आहे. आरसीबीने साखळी फेरीत तिसरे स्थान मिळवून यंदाच्या प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे आणि एलिमिनेटरमध्ये त्यांचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी (केकेआर) होणार आहे. RCB आणि KKR दरम्यान होणार एलिमिनेटर सामना 11 ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. जो संघ जिंकेल तो दुसऱ्या क्वालिफायरमध्ये दिल्ली कॅपिटल्सशी लढेल आणि दुसरा क्वालिफायर जिंकणारा संघ अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जशी भिडेल.