IPL 2021 Playoffs Race: आयपीएल प्लेऑफचे चित्र स्पष्ट, CSK ने जिंकली पहिली बाजी तर 6 संघात तिसऱ्या स्थानासाठी चुरशीची लढाई, पहा स्पर्धेचे समीकरण
एमएस धोनी आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 मध्ये आता प्रत्येक संघाचे तीन लीग सामने शिल्लक आहेत आणि हळूहळू प्लेऑफचे चित्र स्पष्ट होत आहे. सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) मागील सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) कडून पराभूत झाल्यानंतर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. त्याचबरोबर सीएसके (CSK) प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. चेन्नईचे 11 सामन्यात 9 विजयांसह 18 गुण आहेत. आता उर्वरित तीन क्रमांकासाठी एकूण 6 संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. यामध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals), रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB), कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders), राजस्थान रॉयल्स (RR), मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांचा समावेश आहे. या सर्व संघांचे 11 सामने झाले आहेत आणि साखळी टप्प्यात 3 सामने शिल्लक आहेत. अशा स्थिती आज आपण प्लेऑफ शर्यतीचे समीकरण जाणून घेणार आहोत. (IPL 2021 Points Table Updated: धोनीच्या CSK चा प्लेऑफ फेरीत प्रवेश तर SRH चा गेमओव्हर, पहा लेटेस्ट पॉईंट टेबल)

प्लेऑफच्या शर्यतीत आव्हान कायम राहण्यासाठी प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे. विशेषतः कोलकाता आणि गतविजेता मुंबईला. कारण या दोन संघांनी प्रत्येकी 5 सामने जिंकले आहेत आणि जर दोन्ही संघ शेवटचे तीन सामने जिंकण्यात यशस्वी झाले तर ते प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकतात. चला समजून घेऊया की या 6 संघांपैकी कोणत्यासाठी प्लेऑफ गाठण्याचा मार्ग सोपा आहे आणि कोणासाठी कठीण आहे?

दिल्ली कॅपिटल्स: गेल्या आयपीएलचा उपविजेता दिल्ली सध्या चेन्नईनंतर गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दिल्लीने आतापर्यंत 11 पैकी 8 सामने जिंकले आहेत आणि त्याचे 16 गुण आहेत. संघाला आणखी 3 सामने खेळायचे आहेत आणि तो जास्तीत जास्त 22 गुण मिळवू शकतो. तथापि, जर दिल्लीने एकही सामना जिंकला, तर ते प्लेऑफमध्ये प्रवेश करतील. पण केकेआरविरुद्ध शेवटच्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर संघाच्या टॉप-2 मध्ये येण्याच्या आशेला थोडासा धक्का बसला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: आरसीबी सध्या 11 पैकी 7 सामने जिंकून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांना आणखी तीन लीग सामने खेळायचे आहेत. मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध विजयानंतर संघाच्या टॉप-4 मध्ये येण्याच्या आशा वाढल्या आहेत. जर संघ 3 पैकी 2 सामने जिंकण्यात यशस्वी झाला, तर तो प्लेऑफमध्ये सहज दाखल होईल.

कोलकाता नाईट रायडर्स: केकेआरने आयपीएल 2021 मधील 11 पैकी 5 सामने जिंकले आहेत आणि 10 गुणांसह संघ सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सचेही 11 सामन्यांमध्ये समान गुण आहेत. पण कोलकाताचा नेट रनरेट चांगला आहे. संघाला अजून तीन सामने खेळायचे आहेत. जर संघ यापैकी 2 सामने चांगल्या रन रेटने जिंकू शकला, तर प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा दावा अधिक बळकट होईल.

मुंबई इंडियन्स: आयपीएल 2021 गतविजेत्या मुंबईसाठी चांगले राहिले नाही. कोलकातासह त्यांनी 11 सामन्यांमध्ये संघाचे 10 गुण आहेत. मुंबईने पाच सामने जिंकले आणि 6 गमावले. तथापि, संघाचा रन रेट -0.453 कोलकाता (0.363) पेक्षा खूपच वाईट आहे. अशा स्थितीत अंतिम चारमध्ये पोहोचण्यासाठी मुंबईला उर्वरित 3 सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील

.

दुसरीकडे, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा खूपच अंधुक आहेत. दोन्ही संघांनी 11 पैकी प्रत्येकी 4 सामने जिंकले आहेत. पण चांगल्या रन रेटमुळे पंजाब गुणतालिकेत राजस्थानच्या वरचढ आहे. पंजाब 6 व्या आणि राजस्थान 7 व्या स्थानावर आहे. या दोन संघांचे 3 साखळी सामने शिल्लक आहेत. जरी दोन्ही संघांनी तिन्ही सामने जिंकले, तरीही त्यांचे जास्तीत जास्त 14 गुण असतील. अशा स्थितीत पंजाब आणि राजस्थानच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता कमी आहे.