IPL 2020: कोण आहे मुंबई इंडियन्सचा सर्वात धोकादायक प्लेयर? दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगने घेतले 'हे' नाव
रोहित शर्मा टीममेटसह सेलिब्रेट करतो (Photo Credits: IANS)

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात शनिवारी आयपीएल (IPL) 2020 च्या सलामीच्या सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटलचे मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग (Ricky Ponting) यांनी टी-20 क्रिकेटमधील ‘प्रीमियर फलंदाज’ म्हणून घोषित केलेल्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचे (Rohit Sharma) कौतुक केले. 2013 मध्ये मुंबई इंडियन्सची धुरा रोहितकडे सोपवलेल्या दोन वेळा वर्ल्ड कप विजेत्या माजी कर्णधाराने भारतीय सलामी फलंदाजाला मुंबई इंडियन्सचा ‘धोकादायक’ खेळाडू (Mumbai Indians' Dangerous Player) असे म्हटले. हंगामातील ‘मुंबई इंडियन्स’चा धोकादायक. रोहित शर्मा, त्यांचा कर्णधार. जगातील प्रमुख टी-20 फलंदाजांपैकी एक. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो की आयपीएलमध्ये, असा उल्लेखनीय विक्रम त्याच्या नावावर आहे,” क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मुंबई इंडियन्सच्या सर्वात धोकादायक प्लेयरचे नाव घेण्यास सांगितले असताना पॉन्टिंगने सांगितले. 2013 मध्ये रोहितने मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून पदभार स्वीकारल्यापासून, फ्रँचायझीने सात पैकी चार हंगाम जिंकले आहेत आणि सध्या आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रँचायझी आहे. (IPL 2020: मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा पूर्ण करणार षटकारांचे द्विशतक, 'हे' 4 आयपीएल रेकॉर्ड करण्याच्या तयारीत हिटमॅन, जाणून घ्या)

आयपीएलमधील सर्वोत्तम संघांपैकी मुंबई इंडियन्सच्या उदयात रोहितची मोठी भूमिका राहिली आहे. पॉन्टिंग म्हणाला की रोहित त्याच्या कारकीर्दीच्या सर्वात चांगल्या टप्प्यावर आहे आणि त्याच्या पुढे खूप कठीण आहे. “तो सध्या त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे, त्याला मागे टाकणे खूप कठीण आहे,” पॉन्टिंग पुढे म्हणाले. यापूर्वी रोहितनेदेखील एक खेळाडू म्हणून आणि नंतर प्रशिक्षक म्हणून मुंबई इंडियन्ससोबतच्या पॉन्टिंगच्या कार्यकाळाबद्दल खूप कौतुक केले.

दरम्यान, गतविजेते चॅम्पियन्स 19 सप्टेंबर रोजी अबू धाबी येथे मागील वर्षीच्या उपविजेते चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध आपली मोहीम सुरू करणार आहेत. आयपीएलचे चार विजेतेपद जिंकणारी मुंबई इंडियन्स एकमेव टीम आहे आणि यंदा विक्रमी पाचव्या जेतेपदासाठी मैदानावर उतरतील.  दुसरीकडे, श्रेयस अय्यर यांच्या नेतृत्वात दिल्लीने 2012 नंतर पहिल्यांदा मागील वर्षी प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. प्लेऑफमध्ये त्यांचा चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभव झाला, तथापि, आपल्या लढाऊ भावनेसाठी त्यांनी प्रशंसा मिळवली. आगामी आवृत्तीपूर्वी दिल्लीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील काही मोठ्या खेळाडूंना लिलावात खरेदी केले. या फ्रँचायझीने मार्कस स्टोइनिस, अ‍ॅलेक्स कॅरी, शिमरोन हेटमायर, एनरिच नॉर्ट्जे आणि डॅनियल सॅम यांना कायम ठेवले. त्यांच्याकडे अजिंक्य रहाणे आणि रविचंद्रन अश्विन यांची जोडीही आहे, ज्यांचा अनुभव युएईमध्ये मोलाचा ठरेल.