भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील अंतिम सामना नरेंद्र स्टेडियम या जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. हे दोन्ही संघ 20 वर्षांनंतर विश्वचषकाच्या अंतिम फेरीत एकमेकांशी भिडत आहे. 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा शेवटचा पराभव केला होता. त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भारत मैदानात उतरेल. टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर हे तिसरे विजेतेपद असेल. त्याचबरोबर सहाव्यांदा चॅम्पियन बनण्याकडे ऑस्ट्रेलियाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला नववा धक्का लागला आहे. टीम इंडियाचा स्कोर 226/9

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)