Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. 12 जून रोजी झालेल्या या दुर्घटनेत जवळपास अडीचशे लोकांना जीव गमवावा लागला. त्या पार्श्वभूमीवर 13 जून रोजी बेकनहॅममध्ये संघाच्या अंतर्गत सामन्यापूर्वी भारतीय खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून मैदानात उतल्याचे दिसून आले. सामन्यापूर्वी त्यांनी एक मिनिट शांतता पाळली. 12 जून रोजी अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय 171 अहमदाबाद विमानतळाजवळ कोसळले. विमानात क्रू मेंबर्ससह 266 प्रवासी होते. या दुर्दैवी घटनेत अपघातात फक्त एकच जण वाचला. तर सर्व 265 प्रवासी मृत्युमुखी पडले. दरम्यान, 20 जूनपासून भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होत आहे.
Team India observing a minute's silence to pay homage to the victims of the Ahmedabad plane crash. pic.twitter.com/B2p5WEL2l0
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 13, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)