भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना (India vs South Africa 3rd T20I) मंगळवारी इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा 49 धावांनी पराभव केला. या पराभवानंतरही टीम इंडियाने मालिका 2-1 अशी जिंकली आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 20 षटकांत 3 गडी गमावून 227 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाला निर्धारित 18.3 षटकांत केवळ 178 धावाच करता आल्या. भारताकडून दिनेश कार्तिकने 46, दीपक चहरने 31 आणि ऋषभ पंतने 27 धावा केल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)