पालघर जिल्ह्यात तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या विराज एस.एम.एस 2 कंपनीत काल बैठकी दरम्यान मुंबई लेबर युनियनच्या कामगारांनी तोडफोड केली आणि पोलीसांवर देखील हल्ला केला. तीन चार दिवसांपासून या कंपनीत मुंबई लेबर युनियनच्या कामगारांनी संप पुकारला होता. त्या संदर्भात बैठक बोलावली होती. काही मुद्द्यांवर असहमती झाल्यामुळे युनियनच्या कामगारांनी तोडफोड करायला सुरवात केली. या हल्ल्यात 15 पोलीस जखमी झाले. यावेळी संतप्त कामगारांनी पोलिसांच्या गाड्यांची, आसपासच्या गाड्यांची आणि कंपनीच्या कार्यालयची मोठया प्रमाणात तोडफोड केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)