Suicide | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Maratha Reservation: हिंगोली जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दोघांनी आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा जिल्ह्यात पेटला आहे. सर्वत्र तीव्र आंदोलन सुरु आहे. जिल्ह्यातील वसमक तालुक्यातील नाहद येथील एका युवकाने विहरीत उडी घेऊन, तर कळमनुरी तालुक्यातील माळधामणी येथील एका युवतीने घरामध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवले आहे. पोलिसांनी या दोन्ही ठिकाणी घटनास्थळी जाऊन पंचनामे केले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेली युवती मंगळवारी हिंगोली -कळमनुरी राष्ट्रीय महामार्गावर माळधामणी फाट्यावर झालेल्या रास्ता रोको आंदोलनात सहभागी होती. आरती शिंदे असं युवतीचे नाव होते. गोंविदा कावळे असं मृत तरुणाचे नाव होते. नहाद घटनास्थळावर वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी यांनी प्रत्यक्ष पाहणी करत शासनाला अहवाल पाठवण्याचे आश्वासन दिले. गोंविदाने नहाद परिसरातील एका विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवले. आत्महत्या करण्याऱ्यापुर्वी त्यानं एक चिठ्ठी लिहली ज्यात त्याने मराठा आरक्षण मिळाले पाहिजे असं उल्लेख केला. अशी माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली.

आरती शिंदे हीनं मंगळवारी रात्या रोको आंदोलनात प्रत्यक्ष भाग घेतला होता. तीनं बुधवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तीने आरक्षणाची मागणी केली होती. दोन दिवसांत दोन तरूणाने आयुष्य संपवले त्यामुळे पुन्हा एकदा मुद्दा संतापला आहे. या घटनेमुळे गावात शोककला पसरली आहे.