
आज कार्तिकी एकादशीनिमित्त आज लाखो पंढरपूरात (Pandharpur) विठुरायांच्या दर्शनासाठी जातात. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून असंख्य भाविक आज पंढरपूरात दाखल होतात. असेच बेळगावच्या मांडोळी आण हंगरगा गावातले लोक विठुरायाच्या दर्शनासाठी निघाले असता पंढरपूरात त्यांच्या गाडीला अपघात झाला. यात 5 वारकरी ठार झाले आहेत. तसेच अजून बरेच वारकरी जखमी झाल्याची बातमी मिळत आहे. लोकमत ने दिलेल्या वृत्तानुसार, हे वारकरी एका टेम्पोमध्ये बसून पंढरपूरच्या दिशेने निघाले होते. वारक-यांच्या मृत्यूची बातमी कळताच मांडोळी आणि हंगरगा गावात शोककळा पसरली आहे.
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूराला निघालेल्या या वारक-यांचा टेम्पो समोरून येणा-या ट्रकला धडकला. हा अपघात इतका भीषण होता की यात 5 वारक-यांचा जागीच मृत्यू झाला. जखमींचा आकडा अद्याप समजू शकला नाही. जखमी वारक-यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी! धुक्यामुळे ट्रेनला उशीर झाल्यास SMS द्वारे आधीच मिळणार माहिती
शुक्रवारी पहाटे चार वाजता सांगोल्या जवळील मांजरी येथे हा अपघात घडला आहे. या घटनेत दोघे जण गंभीर असून इतर जखमींवर सांगोला आणि पंढरपूर येथे उपचार सुरू आहेत. बेळगाव तालुक्यातील मंडोळी गावातील लोक खासगी टेम्पोमधून कार्तिकी एकादशी निमित्त विठोबाच्या दर्शनासाठी जात होते वाटेतच त्यांच्यावर काळाने झडप घातली. मृतांमध्ये हंगरगा येथील एक तर मंडोळी येथील चौघांचा समावेश आहे.
सध्या पोलिसांनी अपघाताच्या ठिकाणी जाऊन पंचनामा केला आहे. या घटनेनंतर बेळगावातील मंडोळी गावावर शोककळा पसरली आहे. मंडोळी ग्राम पंचायतीचे अध्यक्ष गावकरी पंढरपूरकडे रवाना झाले आहेत.